Home A blog A मांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

मांसाहार लोकांना हिंसक बनवितो काय

इस्लाम धर्म भोजन आणि आहाराच्या संदर्भात काही नियम प्रस्तुत करतो. तो शाकाहारी पशूंचे मांस खाण्याची अनुमती देतो. विशेषतः आठ प्रवर्गाच्या चतुष्पाद (तो पशू जो दूध देणारा  आणि चार पायांचा असतो अशा) प्राण्यांचे, परंतु मांसाहारी पशुंना खाण्यास मनाई करतो. इस्लाम धर्म ज्या जनावरांना खाण्याची अनुमती देतो त्या जनावरांमध्ये शेळी, मेंढी, बैल, म्हैस  आदींचा समावेश होतो. एवढेच नव्हे तर या वैध (हलाल) ठरविलेल्या जनावरांना हलाल पद्धतीनेच जुबाह (कापले) गेले पाहिजे अन्यथा ते खाण्यायोग्य नाहीत ती जंगली जनावरांची   शिकार करतात, ते वैध (हलाल) नाहीत. येथपर्यंत की शाकाहारी जनावरांपैकी काही जनावरे उदा. डुक्कर मुसलामानांकरिता आणि ज्यूंकरिता हराम (निषिद्ध) आहे.
या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही की मांसाहार लोकांना अधिक हिंसक बनवितो. जसे या आधीच सांगितले गेले आहे की एखाद्या माणसाचे पालनपोषण आणि जगासंबंधी  त्याचा दृष्टीकोन त्याला हिंसक किंवा शांतताप्रिय बनवितो. उदा. जर्मन देशाचा नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर पूर्णतः शाकाहारी होता. परंतु, त्याच्या अंतःकरणात कुस्तित आणि वाईट   महत्त्वाकांक्षा, अर्थात शेजारी राष्ट्रांना बलपूर्वक ताब्यात घेणे, यासारख्या भयंकर गोष्टी होत्या आणि वस्तुतः तो लक्षावधींच्या नरसंहारास जबाबदार होता. यास्तव अशा मनोरचित  कल्पनांना तिरस्काराने रद्द करण्याची गरज आहे. कारण अशा कल्पित गोष्टी यालाच पात्र आहेत. प्रेम आणि सहानुभूती तसेच तिरस्कार व शत्रुत्व या गोष्टींचा संबंध खाद्य पदार्थांशी व  आहाराशी जोडणे तर्कसंगत ठरत नाही. भारतातील आदिवासी अनेक प्रकारचे मांस खातात, परंतु, त्यांच्याविषयी क्रूरतेची ओरड होत नाही.

– सय्यद हामीद मोहसीन

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *