Home A blog A ‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’

‘एक ईश्वर एक मानव कुटूंब’

आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची लेकरे : सलमान अहमद

लातूर (शादाब शेख)
जगातील सर्व मानवजातीचा निमार्ताही एकच आहे आणि मानवजातीची सुरूवातही एकाच आई- वडीलांपासून झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशवासी एकमेकांचे बांधव आहोत, एकाच  कुटुंबातील आहोत. हा धागा आम्हाला एका नात्यात गुंफतो. एकमेकांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवितो, असे प्रतिपादन एस.आय. ओ. चे प्रदेशाध्यक्ष सलमान अहमद यांनी  केले. लातूर येथील खोरी गल्ली स्थित स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते ‘एक ईश्वर , एक मानव कुटुंब’ या अभियानादरम्यान ते बोलत  होते. यावेळी प्रदेश सचिव उजेर अहमद रंगरेज, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमैर अहमद सिद्दीकी, खिजर शिबीबी, शहराध्यक्ष अली हैदर पटेल, शहर सचिव अब्दुल्लाह मनियार,  इंजिनिअर शादाब शेख उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्व स्तरांतील, वर्गातील, व्यवस्थेतील लोकांचा ईश्वर एकच आहे. सध्या समाजात आपसात मनभेद वाढलेले असल्याचे दिसत  आहेत. ज्या देशातील लोकांमध्ये जात, पात, धर्म आदींबद्दल मनभेद असतील त्या देशाची प्रगती खुंटते. विद्यार्थ्यांमध्ये ही दिवसेंदिवस वैमनस्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे.  इस्लामबद्दल जाणून बुजून पसरविल्या गेलेल्या गैरसमजामुळे मानवकल्याणाला एका नात्यात गुंफणाऱ्या तत्वापासून लोक दूर आहेत. लोकांची मने यामुळे दुभंगलेली आहेत. एसआयओ  ‘एक ईश्वर एक कुटूंब’ या अभियानाद्वारे सर्व मनभेद, गैरसमज दूर करून सर्व स्तरातील, व्यवस्थेतील, वर्गातील लोकांना मानवतेच्या एका सूत्राचा संदेश समाजाच्या सर्व स्तरात   पोहचवून देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, वैयक्तिक भेटीगाठींद्वारे एकात्मतेचा, एक ईश्वराचा, एक कुटुंबाचा समतेचा, न्यायाचा संदेश  जवळपास साठ लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अभियानादरम्यान एसआयओने एक कारवां (शिष्टमंडळ) बनवून दक्षिण महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांतून तब्बल दोन हजार  किमीचा प्रवास केला. हा कारवां मूंबई, ठाणे, पालघर, पूणे, पिंपरी चिंचवड , कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद मार्गे दक्षिण महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांतून तब्बल 1500 किमी चा  प्रवास करत लातूरला पोहचला होता. येथून पुढे उदगीर, नांदेड,परभणी, जालना असा प्रवास करत औरंगाबादला याचा समारोप झाला. लातूर येथे पत्रकार परिषद, स्ट्रीट दावत वर्क,  विद्यार्थी संवाद कार्यक्रम, मस्जिद परिचय कार्यक्रम, मानवी साखळी आदी उपक्रमाद्वारे विद्यार्थी व लोकांपर्यत पोहचवून मानवतेला जोडण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही  सर्व एका ईश्वराचे अनुयायी एकाच कुटुंबातील बंधू आहोत. आमच्या मुलभूत प्रश्न आणि गरजा एकच आहेत. आमचे विचार जेव्हा एका सुत्रांत बांधले जातील तर निश्चितच भेदभाव  संपून प्रगतीकडे वाटचाल होईल.
मानवकल्याणाचे हित डोळ्यासमोर ठेऊन,  हा कारवां पुढेही काम करील. या अभियानात हजारो कार्यकर्त्यांनी काम केले. अभियान यशस्वी करण्यासाठी एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी मी अल्लाहकडे या अभियानाच्या यशस्वीतेकरीता तसेच समाजात, देशात समता, न्याय, एकात्मता व अखंडतेकरीता प्रार्थना  करत असल्याचे यावेळी इंजि. सलमान अहमद म्हणाले
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *