Home A मूलतत्वे A परलोकवरील श्रद्धेचा महत्त्वाचा पैलू
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

परलोकवरील श्रद्धेचा महत्त्वाचा पैलू

जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच श्रद्धा मानवतेला वास्तविक व सुदृढ देणग्यांनी व सुखांनी अलंकृत करु शकते आणि भविष्यातील समृद्धी व उन्नतीचे आधार बनू शकते. या विश्वासाचा गाभा ईश्वरावर श्रद्धा व त्याच्याशी मनःपूर्वक प्रेम होय. हा विश्वास व्यक्तिगत जीवनास पावित्र्य देऊन आपल्या निर्माणकर्त्याशी सानिध्य मिळवून देतो; पण पारलौकिक जीवनावरील श्रद्धेखेरीज ईश्वरावरील विश्वास वा त्याच्यावरील प्रेमाला काही अर्थ उरत नाही. परलोकची कल्पना माणसाला एक प्रकारच्या रक्षणाची भावना देत असते. यानंतर मानवाला अशी खात्रीपूर्वक शाश्वती प्राप्त होते जी आपल्या पार्थिव अंतानंतर नष्ट होत नाही. आपल्या जीवनात केलेले प्रयास व कष्ट निष्फळ होत नाहीत. उलट त्याला त्यांचा मोबदला या नश्वर जगात जरी मिळाला नाही तरी तो मोबदला पुढे येणाऱ्या परलोकीय जीवनामध्ये कसल्याही परिस्थितीत मिळल्याशिवाय राहणार नाही.
अशी ही फळे आहेत जी केवळ अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर विश्वासरूपी वृक्षापासून निर्माण होतात; पण इस्लाम केवळ येथेच थांबत नाही याखेरीज आणखी बरेचसे आम्हाला देतो. त्याची कहाणी इतर कहाण्यांपेक्षा भिन्न व अधिक रुचिर आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *