Home A hadees A मुलाबाळांचे अधिकार

मुलाबाळांचे अधिकार

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याचे कर्म समाप्त होतात, परंतु तीन प्रकारचे कर्म असे आहेत   ज्यांचे पुण्य मृत्यूनंतरही मिळत राहते. एक त्याने ‘सदक-ए-जारिया’ केला असेल अथवा असे ज्ञान मागे सोडले असावे ज्यामुळे लोकांना लाभ व्हावा तिसरे कर्म म्हणजे त्याच्याकरिता  ‘दुआ’ (प्रार्थना) करीत राहणारा सदाचारी पुत्र.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
‘सदक-ए-जारिया’ म्हणजे असे दान ज्याद्वारे अधिक काळपर्यंत लाभ घेतला जावा. जसे- कालवा खोदण्यात यावा अथवा विहीर खोदली जावी अथवा प्रवाशांकरिता पथिकाश्रम बनविले  जावे अथवा रस्त्याच्या कडेला झाडे लावली जावीत अथवा काही धार्मिक मदरसांमध्ये पुस्तके दान दिली जावीत वगैरे. म्हणजे जोपर्यंत त्या कर्मापासून लोक लाभ घेत राहतील पुण्य  मिळत राहील. अशाप्रकारे त्याने एखाद्याचे अध्यापन केले असेल अथवा धार्मिक पुस्तके लिहिली असतील तर त्याचे पुण्यदेखील त्याला मिळत राहील. निरंतर पुण्य मिळत राहील असे  तिसरे कर्म म्हणजे त्याचा पुत्र, ज्याला त्याने सुरूवातीपासूनच उत्तम शिक्षण-प्रशिक्षण दिले असेल आणि या प्रयत्नांच्या परिणामस्वरूप तो पुत्र सदाचारी आणि संयमी बनला आहे.  जोपर्यंत हा मुलगा जगात जिवंत राहील त्याच्या पुण्यकर्मांचे फळ त्याच्या पित्याला मिळत राहील आणि तो सदाचारी आहे म्हणून तो आपल्या आईवडिलांकरिता दुआ करील.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने एखाद्या अनाथाला आपल्याबरोबर घेतले आणि त्याला जेवू घातले  तर निश्चितच अल्लाहने त्याच्याकरिता ‘जन्नत’ (नंदनवन) निश्चित केली. मात्र त्याने एखादा अक्षम्य गुन्हा केलेला नसावा. ज्या मनुष्याने तीन मुलींचे अथवा तीन बहिणींचे  पालनपोषण केले आणि त्यांना शिक्षणप्रशिक्षण दिले आणि त्यांच्याशी दयेने वागला, इतकेच काय अल्लाहने त्यांना बेपर्वा केले, तर अशा मनुष्यासाठी अल्लाहने ‘जन्नत’ निश्चित  केली.’’ यावर एका व्यक्तीने विचारले, ‘‘जर दोनच असतील तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘दोन मुलींच्या पालनपोषणासाठीदेखील हाच पुण्यफळ मिळेल.’’ इब्ने अब्बास म्हणतात, जर लोकांनी   एका मुलीच्या बाबतीत विचारले असते तरी पैगंबरांनी एकाच्या बाबतीतदेखील हीच शुभवार्ता दिली असती. पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘आणि ज्या मनुष्याला अल्लाहने त्याच्या दोन उत्तम  वस्तू घेतल्या तर त्याच्यासाठी ‘जन्नत’ निश्चित झाली.’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दोन उत्तम वस्तू कोणत्या आहेत?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे दोन्ही डोळे.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये सांगण्यात आलेली एक गोष्ट अशी की जर एखाद्याला मुलीच मुली असतील तर त्यांच्याशी वाईट वर्तन न करता त्यांचे पूर्णत: संगोपन केले पाहिजे. त्यांना धार्मिक व  नैतिक शिक्षण-प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांच्याशी करुणेने व प्रेमाने वागावे. जी व्यक्ती असे करेल त्याला पैगंबर मुहम्मद (स.) स्वर्गाची शुभवार्ता देतात.  अशाचप्रकारे एक भाऊ आहे. त्याला लहान-लहान बहिणी आहेत. त्यानेदेखील या बहिणींना आपल्यावर भार न समजता त्यांचा पूर्ण खर्च सहन केला पाहिजे आणि त्यांना शिक्षण- प्रशिक्षण व धार्मिक नीतीमत्तेच्या अलंकाराने सजविले पाहिजे आणि लग्न होईपर्यंत दया केली पाहिजे. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले, ‘‘ज्या मनुष्याच्या घरात एक मुलगी जन्माला आली आणि त्याने अज्ञानकाळातील पद्धतीने जिवंत दफन केले नाही आणि तिला तुच्छ लेखले नाही आणि मुलांना तिच्या  तुलनेत श्रेष्ठत्व दिले नाही, तेव्हा अल्लाह अशा लोकांना स्वर्गात दाखल करील.’’ (हदीस : अबू दाऊद)

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *