Home A प्रेषित A प्रेषित्वावर श्रध्दा

प्रेषित्वावर श्रध्दा

प्रेषित्वाची गरज: इस्लामचे तिसरे मूलतत्त्व प्रेषित्व आहे. अरेबिक भाषेत यासाठी ‘रिसालत’ हा शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ प्रेषित्व आहे. पारिभाषिक व्याख्येत अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी पाठविलेले प्रेषित असा अर्थ आहे. अरेबिक भाषेत दुसरा शब्द ‘नबूवत’ हा वापरला जातो. प्रेषितांची एक साखळी ईश्वराने का निर्माण केली? याची गरज का भासली होती आणि प्रेषित्वावर श्रध्दा ठेवणे आवश्यक का आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपणास थोडे सविस्तर चितन करावे लागेल. प्रथमतः आपल्याला पाहावे लागले की मनुष्याच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली आहे?
मनुष्य निर्मितीचा उद्देश आणि त्याची जबाबदारी इस्लाम नुसार ही आहे की त्याने अल्लाहची उपासना करावी आणि अल्लाहला शरण जावून अल्लाहच्या आज्ञांकित राहावे. मनुष्याचे पारलौकिक जीवनातील यश हे जीवनउद्देश प्राप्त करण्यातच आहे. अल्लाहची उपासना आणि त्याचे आज्ञांकित होणे म्हणजे त्याच्या आदेशांचे पालन जीवनव्यवहारात करणे आणि त्याद्वारे अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेणे होय. आज्ञाधारकता दिव्य प्रकटनासाठी आहे. दिव्य प्रकटनाशिवाय आपण अल्लाहबद्दल विचारसुध्दा करू शकत नाही. जेव्हा मनुष्य अल्लाहचा आज्ञाधारक सेवक बनून जीवन कंठण्याचे ठरवितो तेव्हा तो आपल्या स्वामीच्या दिव्य प्रकटनाला जाणून घेण्यास आतूर होतो आणि जीवनात अल्लाहचा आज्ञांकित बनून राहातो. तो हे जाणून घेण्यास आतूर होतो की अल्लाहची प्रसन्नता कशात आहे आणि अप्रसन्नता कशात! तो तत्परतेने हे जाणून घेण्यास तयार होतो की त्याने काय करावे की जेणेकरून तो अल्लाहचा विश्वासु सेवक गणला जाईल आणि कोणत्या कृत्यापासून त्याने आपला बचाव करून घ्यावा जेणेकरून अल्लाहची अप्रसन्नता आणि शिक्षेपासून दूर राहता येईल. अल्लाहची आज्ञा न पाळल्यास अल्लाहचा क्रोध आणि कोप होतो याची जाण त्याला सतत असते. हे न जाणता तो अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या मार्गात एक पाऊलसुध्दा पुढे जाऊ शकत नाही.
प्रश्न स्वाभाविकतः निर्माण होतो की आपण कसे जाणून घ्यावे की अल्लाहची इच्छा आणि आदेश काय आहेत? अल्लाहने कोणते कार्य करण्याचे आणि कोणते कार्य न करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे आपण कसे जाणून घ्यावे? एक मार्ग आहे तो आपल्या बुध्दीने त्याची खात्री करून घ्यावी. पण हे पर्याप्त नाही. मानवी बुध्दीच्या पलीकडील हे कार्य आहे. कोणीही आपल्या बुध्दीविवेकानेच फक्त आपले आणि या सृष्टीचे सत्य ओळखू शकत नाही. त्याच्या निर्मात्याचे आणि पालनकर्त्याची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेणे अशक्य आहे. मनुष्यावर या गुणवैशिष्ट्यांचा कोणता परिणाम होतो? त्याचे कोणते आदेश आहेत? मर्यादित बुध्दी या सत्याला जाणून घेण्यास अपात्र ठरते.
दुसरा मार्ग आहे स्वतःच्या अंतर्ज्ञानाचा आणि इच्छाशक्तीचा! परंतु दुसरा मार्गसुध्दा तसा पहिल्यामार्गाप्रमाणेच अपुरा आहे. स्वअस्तित्वाला संपविण्याचे हे अविरत प्रयत्न या उद्देशाला प्राप्त करू शकत नाहीत. अंतर्ज्ञान याने पवित्र जरूर होईल, परंतु असा मनुष्य दिव्य प्रकटन आणि ईश्वरेच्छेला पाहू अथवा अनुभवू शकत नाही. आरशाला जर एखाद्याला प्रतिबिंबित करावयाचे असेल तर आरसा फक्त शुभ्र आणि स्वच्छ असून चालत नाही, हेसुध्दा आवश्यक आहे की ज्याला प्रतिबिबित करावयाचे आहे ते आरशासमोर जवळ असणे आवश्यक आहे. जोपर्यंत अल्लाह दिव्य प्रकटन निश्चित करून त्याला एखाद्याच्या हृदयावर अवतरित करीत नाही तोपर्यंत, अल्लाहचा संदेश परिवर्तीत होणार नाही. परंतु आजपर्यंत हा दावा कोणी केलेला नाही की अल्लाहने दिव्य प्रकटन अंतर्ज्ञानाने आयोजित केले आहे. म्हणून हा दुसरा प्रकारसुध्दा दिव्य प्रकटन जाणून घेण्यासाठी असमर्थ ठरतो.
तिसरा मार्ग अल्लाहचे दिव्य प्रकटन आणि प्रसन्नता प्राप्त करण्याचा सामुदायिक चितन मनन हा आहे. व्यक्तिगत चितनच्या विरोधात जसा आंधळा मनुष्य म्हणजेच दृष्टीहीन मनुष्य दृष्टीवान मनुष्याची बरोबरी करू शकत नाही, तसेच माणसांची गर्दी दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहे. ही गर्दी अशा माणसांची असते जे व्यक्तिगतरित्या दिव्य प्रकटन आपल्या बुध्दीनुसार जाणून घेण्याससुध्दा असमर्थ ठरतात. म्हणून हा मार्गसुध्दा वरील दोन्ही मार्गांप्रमाणे अपूर्ण आणि अपर्याप्त असा आहे. म्हणून असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही की वरील तिन्ही मार्ग मनुष्याची ही निकड पूरी करण्यास असमर्थ आहेत.
आपण हे सत्य नाकारू शकत नाही की आपण स्वतः अनेक बाबतीत वाईटापासून चांगले ओळखू शकतो. अशा प्रसंगी आपली बुध्दी, अंतरात्मा, दिव्य मार्गदर्शन आणि आपला विवेक आपणास साहय्य करीत असतात. हे दुसरे तिसरे काही नसून चांगले आणि वाईट यांची पारख करणे होय. पण असा अनुमान काढणे हे योग्य होणार नाही की मनुष्य जर लहानातील लहान बाबींना वेगळे करू शकतो अथवा ओळखू शकतो तर तो दिव्य प्रकटनाला जाणून घेण्याससुध्दा पात्र आहे. काही बाबींचे ज्ञान असणे म्हणजे सर्व बाबींचे ज्ञान आहे असे समजणे चुकीचे आहे. आपण जर धावता दृष्टीक्षेप जगाकडे टाकला तर कळून येते की येथे जीवनमूल्यांबद्दल एकवाक्यता नाही. अनेक बाबींना वाईट किवा चांगले म्हणून सर्वमान्यता अद्याप मिळालेली नाही. अशा अनेक बाबींची लांबलचक यादीसुध्दा सौम्य दृष्टीने साकार होणे अशक्य आहे? अतिसूक्ष्म पडताळणी केल्यास ही यादी आणखी निराशाजनक दिसेल. स्वाभाविकपणे आपण हा दावा करूच शकत नाही की हा पुरावा तकलादू आहे. जर मानवाने ठरविले की लहान वस्तूंचा गट आपणास कशाचीच खात्री देऊ शकत नाही की ते चांगल्या आणि वाईटाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पणती प्रकाशमान आहे परंतु ती सूर्यांची जागा घेऊ शकत नाही, जो समस्त सृष्टीला प्रकाशमान करतो.
म्हणून मनुष्याची असमर्थता याबाबतीत मान्य करणे स्वाभाविक आहे. बुध्दी किवा अंतर्ज्ञानसुध्दा याला आवाहन देऊ शकत नाही. अशा परिस्थितीला दिव्य मार्गदर्शनाचीच गरज भासते. एकीकडे मनुष्याची बुध्दी आणि आंतर्ज्ञान दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहेत. तर दुसरीकडे दिव्यप्रकटनाची गरज ही अन्न आणि पाण्यासारखी निकडीची आहे. अशा परिस्थितीत दुसरा पर्यायच शिल्लक राहत नाही आणि तो म्हणजे अल्लाहने बाह्य रूपाने एखादी व्यवस्था दिव्य प्रकटनासाठी करावी.
म्हणून एका बाजूला माणसाची असमर्थता आणि दिव्य प्रकटनाची तीव्र आणि मौलिक निकड, तसेच दुसऱ्या बाजूला अल्लाहचे प्रभुत्व, कृपाळु, दयाळु आणि सर्वज्ञ न्यायप्रियता, या सर्व ईशगुणांच्या परिणामामुळे मनुष्याला अंधारात चाचपडत ठेवणे हे अशक्यप्राय आहे. मानवाला अशा वेळी मदतीची गरज होती आणि दिव्य मार्गदर्शनाची निकड होती, ज्यामुळे त्याला सरळ मार्गक्रमण व आज्ञाधारकता आपल्या जीवनात अंगीकारता आली. हे कसे शक्य आहे की सर्व विश्वांचा स्वामी अल्लाह हा आपल्या निर्मिती (मानवतेसाठी) मार्गदर्शनाची बाह्य व्यवस्था करून दिव्य संदेश मानवांपर्यंत पोहोच करणार नाही? अल्लाहने यासाठी एक दिवसाचासुध्दा उशीर केलेला नाही. अल्लाह एकीकडे मानवासाठी भौतिक गरजा भागविण्यासाठी विस्तीर्ण अशी व्यवस्था करून ठेवतो आणि दुसरीकडे मानवासाठी त्याच्या नैतिक आणि धार्मिक गरजांची व्यवस्था करून ठेवणार नाही, असे होणे नाही! अल्लाहने मनुष्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्याने सत्यमार्गावर आपले जीवन कंठावे, अल्लाहच्या कृपेच्या आणि न्यायप्रियतेच्या विरोधात असते जर मानवाच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहने आवश्यक ती व्यवस्था केले नसती. अल्लाहने तशी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेला पारिभाषिक शब्दात ‘‘प्रेषित्व’’ असे म्हणतात. ज्या मनुष्याद्वारे दिव्य मार्गदर्शनाची ही व्यवस्था केली जाते त्यांना ‘प्रेषित’ असे म्हणतात.
हे अगदी स्पष्ट आहे की मनुष्य दिव्य प्रकटनाबद्दल प्रेषिताशिवाय जाणू शकत नाही. हेसुध्दा तितकेच स्पष्ट आहे की प्रेषित्वावरील श्रध्दा (ईमान) मुस्लिमासाठी अत्यावश्यक आहे. हे इतके गरजेचे आहे जसे स्पष्ट पाहण्यासाठी दोन डोळ्यांची आवश्यकता आहे. जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग असेल तर त्या मार्गालाच त्या ठिकाणी पोहचण्यासाठी स्वीकारावे लागते.
ही बाब येथे संपत नाही तर प्रेषित्वाचे व्यावहारिक महत्त्व यापेक्षा अधिक स्पष्ट आहे. प्रेषित्वाविना अल्लाहला व पारलौकिक जीवनास समजणे उमजणे अशक्य आहे. मग दिव्य प्रकटनाबद्दल तर विचारू नका! प्रेषित्व हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे आपणास अल्लाह आणि पारलौकिक जीवनाचे ज्ञान मिळते. स्पष्टपणे सांगायचे तर प्रेषित्वामध्ये श्रध्दा ठेवण्याशिवाय अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणे शक्य नाही. म्हणून प्रेषितांवरील श्रध्दा ही इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी एक आहे. श्रध्देचे हे एक मौलिक अंग आहे.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *