Home A प्रेषित A प्रेषितांची प्रतिरक्षात्मक तयारी आणि सैन्य प्रशिक्षण

प्रेषितांची प्रतिरक्षात्मक तयारी आणि सैन्य प्रशिक्षण

मदीना स्थायिक झाल्यावर प्रेषितांनी ‘नमाज’ प्रस्थापित करणे, अन्सार आणि मुहाजिरीनना आपसात बंधु बनविणे व संवैधानिक करार करणे याव्यतिरिक्त आणखीन एक मोठे कार्य केले, ते म्हणजे मदीना शहराची प्रतिरक्षात्मक व्यवस्थेची स्थापना आणि मुस्लिमांचे सैन्यप्रशिक्षण.
खरे पाहता बर्याच कारणास्तव आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने सामरिक कार्यवाहीचा मार्ग म्हणजे काही चांगला मार्ग नव्हता. परंतु मुस्लिमांच्या रक्षणात्मक गरजांस्तव हे आवश्यक होते. विरोधकांचा हल्ला कोणत्याही समयी शक्य होता. त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे अशा मर्यादित धर्माची शिकवण देणारेदेखील नव्हते की एका गालावर कोणी झापड मारली तर त्यास दुसराही गाल द्यावा. येथे तर एका क्रांतीची योजना होती आणि क्रांतीचे पहिले पर्व हे हिजरत (स्थलांतर) असते तर त्यापुढील दुसरे पर्व संघर्षाचे आणि शत्रुला धूळ चारण्याचे असते. ईश्वरी कायद्याच्या आधारावर एका नवीन विश्वनिर्मितीसाठी जी ‘उम्मते वस्त’ (अर्थात मध्यममार्गी समूह) उभी होती, तिला माहीत होते की, ज्या अमानुष शक्तीने तिला तेरा वर्षांपर्यंत अन्याय व अत्याचाराच्या भट्टीत तापविले होते, घरदार, संपत्ती आणि वतन त्यागण्यास विवश केले होते, त्यांच्या लढण्याच्या मानसिकतेची तलवारसुद्धा डोक्यावर लटकत आहे.
मुळात इस्लाम स्वीकारतानाच मुस्लिमांना माहीत होते की, या स्वीकृतीमध्ये संघर्षाचे घटकसुद्धा आहेत. सत्यावर प्राण ओवाळणारे प्रेषितांचे अनुयायीं या दुहेरी कर्तव्यपूर्तीसाठी नेहमीच तयार आणि दक्ष असत. त्यांना यांची पूर्ण जाणीव असे की, आपले एक पाऊल जानमाज (नमाज अदा करण्याची छोटी चादर) वर तर दुसरे पाऊल सत्यासाठी प्राणांची आहुती देण्यास्तव रणभूमीवर असते. परंतु रक्षणात्मक जवाबदार्या पूर्ण करण्यासाठी भावना आणि प्रेरणांवर काम भागत नसून उत्तम संगठन आणि प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. स्वयं ईश्वरानेच पाठविलेले प्रशिक्षक आणि विद्वत्तेने आदरणीय प्रेषितांनी अतिशय प्रतीकूल परिस्थितीत आपल्या अनुयायांच्या समूहास अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने प्रतिरक्षासाठी तत्काळ तयार केले. हीच बाब या गोष्टीची साक्ष दतो की ईश्वराने प्रेषितांना उत्तम सेनापती आणि मुत्सद्दीसुद्धा बनवून पाठविले.
मदीनाच्या सभोवताली तिन्ही बाजुंना पर्वतांच्या रांगा, दाट वस्त्या आणि खजुरीच्या बागा किवा खडकाळ मैदान होते. जणू ते नैसर्गिकरीत्या सुरक्षित किल्लाच आहे. केवळ उत्तर दिशेकडून एकच मार्ग या शहरास उघडा होता. मक्का शहर हे मदीना शहराच्या दक्षिणेस होते.
मक्कावासीयांना दक्षिणेकडून येऊन उत्तरेकडील मार्गाने मदीनावर हल्ला चढविणे केवळ जिकीरीचेच नसून हानीकारकदेखील होते. ईश्वरी इच्छेनुसार प्रेषितांनी हे काम केले की ‘मदीना’ शहराससुद्धा ‘मक्का’ शहराप्रमाणेच ‘हरम’ (शांतीचे पवित्र स्थळ) ठरवून अशी घोषणा केली की, कोणत्याही शत्रूने मदीना शहरावर हल्ला चढवून त्यांची शांती पवित्रता भंग करण्याचा जर विचारही केला तर शत्रू ‘हरम-ए-मक्का’ (शांतीस पात्र असलेले ‘मक्का’) मध्येसुद्धा सुरक्षित राहू शकणार नाही.
मुस्लिमांच्या सैनिकी प्रशिक्षणासाठी नमाजमध्ये एका रांगेत उभे राहण्याच्या नियमांस आधार बनविण्यात आले. धनुर्विद्या आणि घोडेस्वारीच्या कौशल्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. छोट्याछोट्या सैन्य तुकड्या तयार करून त्यांना सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सीमेवर गस्त करण्यासाठी पाठविणे सुरु केले. क्रमाक्रमाने प्रत्येकास रात्रीच्या पहार्यासाठी डयुट्या सोपविण्यात आल्या. सैनिकात सांकेतिक भाषा शिकविण्यात आली. प्रेषितांनी संपूर्ण सैन्यास सामरिक दृष्टिकोनातून शहराच्या भौगोलिक परिस्थितीचे प्रयोगात्मक ज्ञान दिले. तसेच सीमेवर फिरता पहारा ठेवून प्रेषितांनी इतर प्रदेशातील लोकांना या गोष्टीची जाणीवदेखील करून दिली की आता मात्र या ठिकाणी एक सुसंगठित राज्य अस्तित्वात आहे.
‘बद्र’च्या युद्धापूर्वी सीमावर्ती पहारा आणि देखरेखीसाठी सात-आठ विशेष तुकड्या रवाना करण्यात आल्या. पहिल्या हिजरी सनाच्या रमजान महिन्यात माननीय हमजा बिन अब्दुल मुतल्लिब(र) यांच्या नेतृत्वात तीस सैनिकांची एक तुकडी ‘सैफुल बहर’कडे पाठविण्यात आली. प्रेषित आणि इस्लामचा कट्टर वैरी तीनशे माणसांची एक तुकडी घेऊन आक्रमणाच्या उद्देशाने आला होता. परंतु मुस्लिमांना दक्ष असल्याचे पाहून तो परतला. ‘शव्वाल’ महिन्यात साठ सैनिकांची एक तुकडी माननीय उबैदा बिन हारिस(र) यांच्या नेतृत्वाखाली मक्केतील विरोधकांची स्थिती जाणून घेण्यासाठी रवाना करण्यात आली. या तुकडीस शत्रूपक्षाचे दोनशे सैनिक ‘सनियतुल मुर्रा’ या ठिकाणी आढळले. या शत्रूच्या टोळीची वार्ता ‘मदीना’च्या व्यवस्थापनास देण्यात आली. ‘जीकादा’ महिन्यात माननीय साद बिन अबी वक्कास(र) यांच्या नेतृत्वाखाली ८१सैनिकांची एक तुकडी ‘जोहफा’ या स्थानावर पाठविण्यात आली. ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या दुसर्या वर्षी ‘सफर’ महिन्यात प्रेषित हे स्वतः सत्तर सैनिकांची तुकडी घेऊन ‘अबवा’ या ठिकाणी गेले होते. हे ठिकाण ‘कुरैश’ टोळीचा व्यापारी मार्ग होता. प्रेषितांनी तेथे जाऊन भौगोलिक परिस्थितीचा अचूक अभ्यास केला. तसेच ‘मख्शी बिन उमर’ आणि ‘हजरी’ यांच्याशी समझोता केला. मग ‘रबिउल अव्वल’ च्या महिन्यात दोनशे शिपायांची तुकडी घेऊन ‘बुवाह’ या ठिकाणी गेले. हे स्थान ‘यम्बूह’च्या जवळ आहे. रस्त्यात ‘उमैया बिन खल्फ’ या शत्रूच्या टोळीची गाठ पडली. परंतु दोन्ही पक्षांकडून कोणतीच प्रतिक्रिया झाली नाही. ‘रबीऊल अब्वल’ च्या महिन्यातच ‘करज बिन जाबिर’ याने मदीनाच्या पाळीव प्राण्यांवर दरोडा टाकला. सूचना मिळताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्तर तरुणांना सोबत घेऊन त्याचा पाठलाग केला. परंतु शत्रू पळण्यात यशस्वी झाला. नंतर प्रेषित ‘जुमादल उखरा’मध्ये दीडशे सैनिकांची तुकडी घेऊन ‘जुल उशैरा’ या ठिकाणी गेले आणि येथील ‘मुदलज’ आणि ‘जोहरा’ परिवाराशी समझोता करार केला.
‘रजब’च्या महिन्यात अब्दुल्लाह बिन जहश’च्या नेतृत्वात १२५ योद्ध्यांची एक तुकडी ‘नखला’ च्या मोहिमेवर रवाना केली. ‘कुरैश’च्या एका छोट्याशा काफिल्याशी झडप होऊन शत्रूसैन्याचा एक माणूस ठार झाला. दोन जणांना कैद करण्यात आले आणि एक शत्रु पळून गेला. शत्रूसैन्याची संपत्ती (अर्थात स्वार्या, हत्यार वगैरे) हस्तगत झाली. ही तुकडी मदीना पोहोचली आणि प्रेषितांना संपूर्ण वृत्तान्त कळविला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) त्यांच्या कृत्यावर खूप नाराज झाले. कारण अद्यापपर्यंत प्रेषितांनी युद्धाची परवानगी कोणालाच दिली नव्हती. शत्रूचे दोन कैदी सोडून देण्यात आले. ठार झालेल्या शत्रूसैनिकाच्या हत्येचा मोबदला आणि त्यांची संपत्ती कुरैशजणांना परत पाठविण्यात आली. ‘नखला’ येथील या अनपेक्षित घटनेमुळे मक्कावासी चवताळले.
अशा प्रकारच्या तयारीसह आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सभोवतालच्या बहुतेक कबिल्यांशी संफ साधून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. या मित्रकबिल्यामध्ये ‘हमजा’, ‘जुहैना’,‘जमरा’, ‘जुरआ’, ‘रुबआ’, ‘मुदलज’ आणि ‘जोहरा’ वगैरे परिवारजण सामील होते. यांपैकी काही कबिल्यांबरोबर संयुक्त प्रतिरक्षात्मक करार असून काही कबिल्यांनी केवळ एवढेच स्वीकारले की, मुस्लिमांच्या शत्रूंशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात येणार नाहीत.
मागे उल्लेख झालाच आहे की, मदीना समझोता कराराचेसुद्धा प्रतिरक्षात्मक महत्त्व आहे. या कराराशी समझोता करणार्या सर्वांनीच ही गोष्ट स्वीकारली होती की, अरब कबिल्यांत जे मूर्तीपूजक आणि ‘ज्यू’ सामील आहेत ते मुस्लिमांच्या अधीन आणि युद्धप्रसंगी त्यांचे सहयोगी असतील. त्याबरोबरच ते मक्का शहरातील इस्लामद्वेष्टांना अभय देणार नाहीत आणि युद्ध झाल्यास मुस्लिमांच्या मार्गांत अडचणी निर्माण करणार नाहीत. ‘ज्यू’ शी असा संवैधानिक करार झाला की, युद्ध आणि तहाच्या बाबी सर्व मदीनावासीयांत संयुक्त असतील आणि ‘ज्यू’ समाजाचे लोक मुस्लिमांविरुद्ध लढणार्यांशी लढतील आणि मुस्लिमांनी ज्यांच्याबरोबर तह केला, त्यांच्याशी तह करतील. ‘मदीना समझोता’ कराराच्या या अटींवरून हेच सिद्ध होते की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची विवेकदृष्टी किती प्रगल्भ आणि खोल होती.
प्रतिरक्षणात्मक तयार्यांची एक बाजू अशी होती की, मुस्लिमांमध्ये ईशमार्गात धन खर्च करण्याची प्रचंड शक्तिशाली प्रेरणा निर्माण करण्यात आली. प्रत्येकजण ईश्वर आणि प्रेषितांच्या एका संकेतावर आपले तन, मन, धन अर्पण करण्यास तयार होता आणि समृद्धजण सढळ हाताने व दिलखुलासपणे गरजवंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपली संपत्तीची दारे उघडत असत.
सरतेशेवटी हे स्पष्ट करणे पण गरजेचे आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सामरिक अथवा प्रतिरक्षात्मक तयारीमध्ये ही बाबसुद्धा सामील होती की, सैन्यामध्ये सामरिक शक्तीबरोबरच नैतिकशक्ती वृद्धिगत करावी. अनुशासनाचे महत्त्व केवळ संघटनात्मक दृष्टीनेच नसते. इस्लामने त्यास नैतिक कर्तव्यशक्तीची कौशल्यपूर्ण जोड दिली. अनुशासन भंग केल्याने पूर्ण योजना कोलमडून जाते. ‘नंखला’ च्या मोहिमेवरून ही बाब स्पष्ट झालीच. ‘अब्दुल्लाह बिन जहश(र) यांनी ‘कुरैश’च्या काफिल्यावर छापा मारला असल्याने प्रेषित खूप नाराज झाले. या नाराजीचे कारण असे होते की, केंद्रीय नेतृत्वाकडून असा कोणताच आदेश नसताना त्यांनी छापा मारला होता. आदरणीय प्रेषितांच्या नेतृत्वात चालणार्या राज्यात प्रत्येक मुस्लिमास श्रद्धास्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य आणि ईश्वराची आज्ञा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच प्रत्येकास अन्याय व अत्याचार नष्ट करणारा सैनिक ठरविले आहे. अर्थात प्रत्येकाची ही नैतिक जवाबदारी आहे की, इस्लामी राज्याची सुरक्षा आणि इस्लामी आंदोलनातील अडसर दूर करण्यासाठी गरज पडली तर रणांगणावर उतरावे. संपूर्ण सैनिक प्रेषितांसमोर प्रतिज्ञा करीत असत की, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शत्रुचा सामना करू. आदरणीय प्रेषितांचा हा आदर्श संपूर्ण मुस्लिम समूदायाकरिता आहे.
आदरणीय प्रेषितांनी स्त्रिया, वृद्ध, अपंग आणि युद्धाशी संबंध न ठेवणार्यांना तसेच मंदीर व पूजास्थळातील संन्याशांना ठार करण्याची सक्तीने मनाई केली. त्याचप्रमाणे असा आदेश देखील दिला की, लढताना शत्रूच्या मुखावर ‘इस्लामचा कलमा’ (इस्लामी धर्मसूत्र)आल्यास त्याला ठार करू नये. तसेच ज्या वस्तीतून ‘अजान’ पुकारण्याची साद ऐकू येते अशा वस्तीवर हल्ला करू नये. एखाद्या शत्रूने अभय मागितल्यास किवा शरण येण्याची घोषणा केल्यास त्याला जीवदान द्यावे. या हेतुपूर्तीसाठी युद्ध सुरु करण्यापूर्वी इस्लामी लष्कराकडून घोषणा करण्यात येते की, प्रतिस्पर्धी लष्करास इस्लामी लष्कराची ताबेदारी स्वीकारावयाची असल्यास व शरण येऊन इस्लामच्या अटी मान्य करावयाच्या असल्यास हल्ला करण्यात येणार नाही व संपूर्ण लष्करास जीवदान देण्यात येईल. इस्लाम स्वीकारल्यासही हल्ला करण्यात येणार नाही. या दोन्हींपैकी कोणतीही अट मान्य नसल्यास युद्ध अटळ होईल. युद्धाची हीच पद्धत इस्लाममध्ये आहे. प्रेषितांनी अशी शिकवण दिली की, शत्रूपक्षांकडुन त्यांच्यातील एखाद्या सामान्यजणानेही शरण मिळण्याची विनंती केल्यास संपूर्ण लष्करास शरण देण्यात येईल. तसेच प्रेषितांनी असेही वचन दिले की, शत्रूपक्षाच्या मृतांच्या शवांचा अनादर केला जाणार नाही. पराभूत जणांचे नाक, कान कापण्याची व त्यांच्या शरीराची विभत्सना करण्याची प्रेषितांनी सक्तीने मनाई केली.
हे सामरिक नियम अगदी त्या काळात प्रेषितांनी घालून दिलेले आहेत की, ज्या वेळी कोणतेच आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात नव्हते. कोणतेही संयुक्त राष्ट्र संघ अस्तित्वात नव्हते. अशा या परिस्थितीत संपूर्ण जगाच्या इतिहासात प्रेषित मुहम्मद(स) हेच पहिले तत्वज्ञानी आहेत की ज्यांनी युद्धभूमीवरसुद्धा शत्रूंचे अधिकार आणि मुस्लिमांचे कर्तव्य निश्चित करून दिले. एवढेच नव्हे तर एकार्थाने शत्रूंचे संरक्षणसुद्धा यात आलेच. अपंग, वृद्ध आणि स्त्रियांच्या व युद्धात भाग न घेणार्या लोकांच्या शीलता, प्राण आणि संपत्तीची पूर्ण संरक्षण हमी देण्यात आली.
आजच्या प्रगत युगात मानवाधिकाराचा तोंडी जयघोष होताना आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या गप्पा मारताना आपण पाहतोच आहोत. संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकाराची जोपासना करण्याच्या गप्पा मारणार्या इतरही संस्था सध्या आहेतच. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकाराचे नियम व कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु सुसभ्य, सुशील व प्रगत राष्ट्रेसुद्धा जेव्हा युद्धाच्या मैदानात उतरतात तेव्हा पराभूत पक्षाच्या लोकांचे प्राण घेण्यात येतेच, शिवाय त्यांच्या स्त्रियांच्या शीलतेवर हिंस्त्र पशूप्रमाणे हल्ले होतात. आबालवृद्धसुद्धा विजयीपक्षाच्या तावडीतून सुटत नाहीत. त्यांचा टाहो कुणाच्याही अंतःकरणास पाझर फोडत नाहीत. जीवदान आणि शीलदान मागणार्यांच्या झोळीत अत्याचाराचे निखारे टाकण्यात येतात. प्राण आणि शीलतेबरोबरच संपत्ती नष्ट करण्यात येते. या आधुनिक आणि प्रगत युगातही जेव्हा एखाद्या ठिकाणी टोळीयुद्ध वा सामुदायिक संघर्ष होतात अथवा एखादी क्रांतीची दावेदार शक्ती डोके वर काढते तेव्हा मानवता, शीलता, न्याय वगैरेंची सर्रास होळी करण्यात येते. याची बरीच उदाहरणे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो.
हे एक मोठेच दुर्दैव म्हणावे की, हे आधुनिक आणि प्रगत जग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या मार्गदर्शन स्त्रातापर्यंत पोहोचले नाही.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *