Home A मुस्लिम पर्सनल लॉ A पर्सनल लॉ समाजाच्या आत्म्याचे रक्षक

पर्सनल लॉ समाजाच्या आत्म्याचे रक्षक

व्यक्तिगत कायदे इस्लामी समाजाच्या सामुदायिक आत्म्याचे रक्षक सुद्धा आहेत. कारण सामुदायिक जीवन आणि मृत्यू संबंधीच्या समस्या मध्ये खोलात शिरून पाहिल्यास असे दिसून येईल की कोणत्याही समाजाच्या व्यक्तिगत कायद्यांच्या अत्सित्वाचा संबंध या त्यांच्या श्रद्धा आणि विचाराशी जीवन जोडले गेलेले असते. म्हणून या पायाभूत मूळ कायद्यांची अत्यंत आवश्यकता असते.
याचे उदाहरण वृक्षासारखे आहे. वृक्षाच्या फांद्या, पाने जरी मुळातून निघत असली आणि हिच मूळे त्याना जीवन आणि हिरवेपण देत असली तरी मूळे सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनासंबंधी आणि समृद्धते संबंधी निस्पृह किवा बेपर्वा असत नाहीत. म्हणून जेव्हा मूळे कापली जातात किवा सुकून जातात तेव्हा फांद्या आणि पानेही सुकून जातात. त्याच प्रमाणे जर फांद्या आणि पानेही कापली गेली किवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर मुळांची शक्ती आणि जिवंतपणा शिल्लक राहू शकत नाही. हळू हळू सडून तेही सुकून जातात. अगदी हीच परिस्थिती समुदांयाचे विचार आणि धारणांची सुद्धा असते. जेव्हा धारणा जीवनामध्ये अंमलात असतात तो पर्यंत या धारणामध्ये सुद्धा जीवन आणि शक्ती असते. जेव्हा या धारणा अंमला मध्ये नसतात तेव्हा धारणाच्या नाडीचे ठोके क्षीण होत जातात.
मौलिक धारणा, ज्यांच्या अंतर्गत समाज आपले जीवन व्यतीत करीत असतो, त्या अमलात आणण्यासाठी हे सर्व कायदे आवश्यक असतात. त्यांच्या व्यक्तित्वासाठी त्यांच्या व्यक्तिगत कायद्याचे व्यावहारिक महत्वही सर्वात अधिक असते. म्हणून या कायद्यामधून त्यांचा व्यावहारिक सहयोग किवा असहयोग याचे परिणाम सुद्धा त्याची आपली मौलिक धारणांची बाजू अधिक स्पष्ट होते. हे कायदे मजबूतीने अंमलात आणल्यामुळे या धारणाशी मानसिक संफ अवश्य शाबूत राहतो. पण जर या कायद्याशी व्यावहारिक नाते कापले गेले तर तो संफ कमजोर, अर्ध जीवित आणि शेवटी प्राणहीन होणे क्रमप्राप्त होते. कारण ह्या कायद्याशी सरळ नाते तोडल्याचा अर्थ असा होईल की आता ते समाजाच्या दृष्टीने योग्य आणि स्वीकारार्ह राहिले नाहीत. त्यांना अयोग्य अस्वीकारार्ह ठरविण्याचा निश्चित अर्थ हा होईल की ते ज्या पायाभूत विचार आणि धारणा अंतर्गत निर्माण झाले आहेत, मूळात त्या स्वतः धारणांची महानता आणि सत्यता आता त्यांचे जवळ मान्यता प्राप्त आणि विश्वासार्ह राहीली नाही. दूसरे असे की, त्याला आपल्या या विश्वासार्ह किवा विश्वासाच्या कमतरतेची कारणे स्वतःला सुद्धा समजत नाही.
नंतर हे मानसिक परिवर्तन या मर्यांदे पर्यंतच थांबणार नाही. उलट ते जरूर वाढत जाईल आणि समाज दूसरे विचार आणि दूसर्या धारणांनी प्रभावित होत जाईल. कारण जेव्हा तो(समाज) आपल्या व्यक्तिगत कायद्याशी फारकत घेईल तेव्हां त्याची पोकळी दूसर्या कायद्याच्या संग्रहाशी नाते जोडण्याची आवश्यकता निर्माण होईल. हे दूसरे कायदे दुसर्या कोणत्या तरी धारणा आणि दृष्टीकोनावर निर्माण झालेले असतील हे स्पष्टच आहे ज्या धारणांच्या आधारावर बनलेले व्यक्तिगत कायदे अंगिकारले आहेत खुद्द त्यांच्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे उघडले जातील. त्यामुळे त्यांच्या आपल्या वैशिष्टयांचा संबंध कमकुवत होईल. म्हणून ते या हल्ल्याचा सामना करण्यास सबल असणार नाहीत. परिणामतः त्यांचा पायाभूत विचार आणि धारणा यांचा पाया निश्चित ढासळेल आणि समजुन उमजुन किवा न समजता ते त्यात बदल करण्यास तयार होतील. म्हणून हे वास्तव आहे की कोणत्या ही समाजाचा व्यक्तिगत कायदा हा जिथे त्यांच्या व्यक्तित्वाचे शरीर असते तेथे त्यांच्या आत्म्याचा रक्षकही असतो. राष्ट्राच्या आणि समाजाच्या इतिहासात या बाबींचे पुरावे भरपूर आढळतात. खुद्द इस्लामी समुदायाच्या इतिहासात सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत.
व्यक्तिगत कायद्याला वंचित होणे म्हणजे सामाजिक व्यक्तिमत्वाचा मृत्यू ओढवणे
आपल्या व्यक्तिगत कायद्याला वंचित झाल्यामुळे समाजाचे व्यक्तित्व कोणत्याही प्रकारे जीवंत राहू शकत नाही. कारण व्यक्तिगत कायद्याचे महत्व त्या जमातीच्या वैशिष्टयपूर्ण व्यक्तिमत्वाचा ढाँचा ही असतो आणि त्याच्या आत्म्याचा रक्षक ही असतो. त्यालाच तो वंचित झाल्याने त्याचे व्यक्तित्व शिल्लक राहत नाही. यावर कोणत्याही युक्तिवादास वाव नाही. ही वंचितता म्हणजे त्या जमातीचे अस्तित्व नाकारणे आहे. म्हणून त्यांचा व्यक्तिगत कायदा समाप्त करून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या खास निशाण्या आणि रुपरेषा मिटवून त्यास दुसर्या शरीरात प्रविष्ठ करण्यास भाग पाडणे असा याचा अर्थ होतो. या परिवर्तनामुळे त्यांची वैचारिक आणि काल्पनिक मूळे उखडली गेल्यामुळे कमजोर होतील आणि शेवटी यापुढे त्याचे नियमानुसार जीवंत राहणे संभवनीय असेल कां?
या क्रान्तीनंतर दूसर्या कोणत्या तरी सांस्कृतिक समूहात, पावसाच्या थेंबाप्रमाणे सामावून जाणे हेच त्याच्या नशिबी असेल. या समाजाचे किवा धर्माचे लोक सुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असा याचा अर्थ नाही, ते शिल्लक राहतील आणि हेही शक्य असेल की ते आपल्या जीवनात प्रगतिवर प्रगति करीत जातील तथापि त्या धार्मिक समूहाचे आणि समाजाचे नांव पुसले जाईल. या धार्मिक समूहाचे लाखो करोडो लोक उपलब्ध असताना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तित्वाच्या कथा मात्र भूतकाळ बनून राहतील.
व्यक्तिगत कायद्याची समाप्ति करणेहे एक धोकादायक पाऊल ठरेल.
जमाती आणि धर्मांच्या व्यक्तिगत कायद्याना असाधारण महत्व असते त्यामुळेच कोणत्या जमातीला किवा धर्माला त्यात स्वाभिमान आणि स्वतःला ओळखण्याची थोडीतरी क्षमता असते. आपला व्यक्तिगत कायदा त्यांना प्राणापेक्षा प्रिय असतो आणि कोणतीही किमत देऊन त्याचे रक्षण ते करू इच्छितात. त्याना त्या कायद्याशी सैध्दातिक नाते तर असतेच शिवाय तीव्र भावनात्मक संबंध सुद्धा असतात, त्या भावना फार नाजुक असतात. त्यांचा नायनाट किवा संपविण्याचा प्रयत्न त्या समाजाला सहन होणे शक्य नाही.
दुसर्या कोणत्याही बाबीपासून वंचित होण्यास तो समाज सहन करील परंतु अशा सैद्धांतिक आणि भावनात्मक बाबीपासून दुरावण्याचा विचार सुद्धा तो समाज करू शकत नाही. याच कारणामुळे भूतकाळातील महान आणि शक्तिशाली साम्राज्यानी त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या प्रजेकडून सर्वकाही हिसकावून घेतले तथापि व्यक्तिगत कायद्याना हात लावण्याची हिम्मत त्यानी केली नाही.
रशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांची उदाहरणे अगदी जाहिर आहेत. ब्रिटिशानी हिन्दुस्थानावर शासकीय कब्जा केल्यावर, त्याकाळात हिदुस्थानात जे इस्लामी कायदे लागू होते ते हळूहळू समाप्त करून त्यानी बनविलेले कायदे लागू केले. तथापि येथील नागरिकांचे व्यक्तिगत कायदे रद्द केले नाहीत. कारण येथील मुस्लिमांचे आणि हिदूचे आपापल्या व्यक्तिगत कायद्याशी तीव्र भावनात्मक संबंध आहेत आणि त्यासाठी ते आपले प्राण त्यागही करतील परंतु आपापल्या या कायद्याना रद्दबातल करणे ते कधीही सहन करणार नाहीत ह्या वस्तुस्थितीची त्याना जाणीव होती. म्हणुन या नाजुक भावनाशी छेडछाड करणे म्हणजे त्यांच्यावर अत्यंत हानिकारक परिणाम होतील हे ते जाणून होते.
आता पर्यंत जे वास्तव आहे ते आज अवास्तव होऊ शकत नाही. व्यक्तिगत कायद्याचे हे महत्व इतर जमाती आणि धर्माच्या बाबतीत ही नाकारणे योग्य नाही त्याचप्रमाणे इस्लामी समुदाया संबंधी सुद्धा नाकारणे योग्य होणार नाही. मुस्लिमांचा व्यक्तिगत कायदा त्यांच्या व्यक्तित्वासाठी शरीर आणि त्याच्या समुदायासाठी आत्म्यांची भूमिका राखून आहे आणि त्यापासून वंचित होण्याचा परिणाम त्यांच्या सामुदायिक मृत्यूच्या स्वरुपात समोर येतो. म्हणून जरी त्यांचे नाते धर्म आणि श्रद्धा यांच्याशी जोडलेले नसते तरी हे त्यांच्यासाठी प्राणापेक्षा कमी प्रिय राहिले नसते.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *