Home A hadees A जिव्हेचे रक्षण

जिव्हेचे रक्षण

माननीय सहल बिन असद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर एखादा मनुष्य आपल्या मुखाची आणि आपल्या लज्जास्थानाच्या रक्षणाची हमी देत असेल तर मी त्याच्यासाठी स्वर्गाची हमी देतो.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : मनुष्याच्या शरीरात हे दोन धोकादायक व दुर्बल जागा आहेत जेथून शैतानाला हल्ला करण्यात खूपच सवलत मिळते. अधिकांश पाप याच दोन ठिकाणांहून घडतात. जर कोणी शैतानाच्या हल्ल्यापासून त्यांचा बचाव करील तर उघड आहे की त्या मनुष्याचे राहण्याचे ठिकाण स्वर्गच (जन्नतच) असेल.
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास एक गोष्ट मुखावाटे काढतो ची अल्लाहला खूश करणारी असते. दास त्याच्याकडे लक्ष देत नाही (म्हणजे त्याला महत्त्व देत नाही), परंतु अल्लाह त्या गोष्टीमुळे त्याच्यावर कृपा करतो. अशाप्रकारे मनुष्य अल्लाहला नाराज करणारी गोष्ट मुखाने निष्काळजीपणाने काढतो जी त्याला नरकात ढकलून देते.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे की मनुष्याने आपल्या जिव्हेला स्वच्छंद सोडू नये, जो काही उच्चार करील विचारपूर्वक करील. अशी वाणी मुखावाटे काढू नये जी नरकात घेऊन जाणारी असेल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन काय होते?
    माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, हरकलने अबू सुफियानला विचारले ‘‘हा मनुष्य (मुहम्मद (स.)) तुम्हाला काय म्हणतो?’’ अबू सुफियानने उत्तर दिले, ‘‘हा मनुष्य आम्हाला म्हणतो की अल्लाहचे दासत्व पत्करा आणि शासन व सत्तेत कोणाला भागीदार ठरवू नका आणि तुमच्या वाडवडिलांचा जो धर्म होता आणि जे काही करीत होते ते सोडून द्या आणि हा मनुष्य आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा, सत्याचा अवलंब करा, पावित्र्याने जीवन व्यतीत करा आणि नातेवाईकांची काळजी घ्या.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : हा एका मोठ्या हदीसचा भाग आहे. ती हदीस हरकलच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे की रोमन बादशाह हरकल बैतुल-मकदिसमध्ये होता तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे इस्लामच्या आवाहनाचे पत्र त्याला मिळाले. त्यावेळी तो एका माहीतगार व्यक्तीचा शोध घेत होता. योगायोगाने अबू सुफियान आणि त्याचे काही सहकारी त्याला भेटले. हरकलने त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता– ‘‘या पैगंबराच्या (नबी) आवाहनाच्या मूलभूत वचने सांगा.’’ अबू सुफियान म्हणाला, ‘‘तो एकेश्वराची शिकवण देतो आणि म्हणतो की फक्त एक ईश्वराला (अल्लाहला) माना. फक्त तोच आहे ज्याची सत्ता आकाशांवर व जमिनीवर आहे. वरच्या जगाचेही तोच नियोजन करतो आणि या जमिनीवरील नियोजनदेखील त्याच्याच हातात आहे. सत्ता व नियोजनात त्याने कोणाला भागीदार बनविलेले नाही आणि कोणीही जोरजबरदस्तीने व प्रभावाने त्याचा भागीदार बनू शकत नाही. असे असल्यामुळे फक्त त्याच्याच समोर नतमस्तक व्हा (सजदा करा). प्रत्येक प्रकारच्या संकटप्रसंगी त्याचीच मदत मागितली पाहिजे. वाडवडिलांनी अनेकेश्वरत्वाच्या आधारावर जीवन व्यतीत करण्याची जी व्यवस्था बनविली आहे, तिला तिलांजली द्या. अशाप्रकारे तो आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा आणि सत्याचा अवलंब करा, बोलण्यात आणि करण्यातदेखील. तसेच प्रतिष्ठा व पवित्रतेला हातातून जाऊ देऊ नका. मानवतेविरूद्ध असलेले कर्म करू नका. बांधवाबरोबर चांगला व्यवहार करा. सर्वजण एकाच आईवडिलांची संतती आहे आणि सर्व एकमेकांचे सख्खे बांधव आहेत.’’
    माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे मक्केत त्यांच्या पैगंबरीच्या सुरूवातीच्या काळात गेलो. मी विचारले, ‘‘आपण काय आहात?’’ आदरणीय मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी नबी (पैगंबर) आहे.’’ मी विचारले, ‘‘नबी काय असतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने आपला ‘रसूल’ (संदेशवाहक) बनवून पाठविले आहे.’’ मी विचारले, ‘‘संदेश देऊन त्याने आपणास पाठविले आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी लोकांना चांगुलपणाची शिकवण द्यावी आणि मूर्तींची पूजा करणे बंद करावे आणि अल्लाहच्या एकमेवत्वाचा स्वीकार करावा आणि त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनवू नये.’’ (हदीस : मुस्लिम, रियाजुस्सालिहीन)
स्पष्टीकरण : ही हदीसदेखील नबी (पैगंबर) च्या आवाहनाच्या मूलभूत गोष्टी सांगते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या आवाहनाला अल्पश: शब्दांत एकवटून सांगितले आहे, ‘‘माझे आवाहन हे आहे की अल्लाह आणि दासाच्या खNया संबंधाला योग्य आधारांवर निश्चित करणे, दास व अल्लाहच्या संबंधाची खरा पाया एकेश्वरत्व आहे. म्हणजे अल्लाहच्या सत्तेत कोणालाही सहभागी केले जाऊ नये आणि फक्त त्याचीच उपासना केली जावी, फक्त त्याचीच आराधना केली जावी आणि मानवांदरम्यान योग्य संबंधाचा पाया समान आणि एकमेकांच्या सहानुभूतीचा आहे. म्हणजे सर्व मानव एकाच आईवडिलांची संतती आहे आणि खरे तर आपसांत हे सर्व बांधव आहेत. म्हणून त्यांचे एकमेकांवर प्रेम असायला हवे. त्यांच्या सुख-दु:खात हातभार लावला पाहिजे. असहाय व लाचार बांधवांची मदत केली पाहिजे. कोणावर अत्याचार होत असेल तर सर्वांनी अत्याचाNयाविरूद्ध उभे ठाकले पाहिजे. कोणी अचानक एखाद्या संकटात सापडला असेल तर प्रत्येकाच्या मनाला धक्का पोहोचला पाहिजे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून गेले पाहिजे.
संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *