Home A परीचय A आता इस्लामची गरज उरली नाही काय?

आता इस्लामची गरज उरली नाही काय?

आज विज्ञानाच्या आश्चर्यजनक यशाने पाश्चिमात्य लोकांना असे काही भारून टाकले आहे की त्यांच्यात असा शीघ्रगतीने विचार पसरला आहे, की विज्ञानाने धर्माला कायमचे परागंदा करून टाकले आहे. कारण त्याची उपयुक्तता संपली आहे. मानसशास्त्राच्या तसेच समाजशास्त्राच्या प्रसिद्ध तज्ञापैकी जवळजवळ सर्वांनी अशाप्रकारचे विचार व्यक्त केले आहेत. उदाहरण द्यावयाचे म्हटले तर युरोपमधील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ ‘फ्राईड’ने धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नावर हल्ला व उपहास करताना असे लिहिले की मानवी जीवन तीन प्रकारच्या स्पष्ट मानसशास्त्रीय कालातून जात असतो. रानटीकाल, धर्मकाल आणि वैज्ञानिक काल, आता विज्ञानाचे युग आहे म्हणून धर्माच्या गोष्टीत काही अर्थ व तथ्य नाही, तो संपला आहे व आपले मूल्य हरवून बसला आहे.
धर्माशी वैरभावाचे खरे कारण
धर्माच्या बाबतीत युरोपियन वैज्ञानिकांच्या विरोधी भूमिकेचे खरे कारण तो संघर्ष होता जो त्यांना युरोपीय चर्चच्या विरुद्ध करावा लागला. त्या संघर्षात चर्चने ज्या प्रकारच्या आचरणाचे प्रदर्शन केले ते पाहून ते लोक हेच सत्य आहे असे समजू लागले की धर्म हा प्रतिगामीत्व, रानटीपणा, अंधविश्वास निर्मूल व बिनबुडाच्या विचारांचा परिपाक आहे. म्हणून श्रेयस्कर असे आहे की धर्म कायमचा नष्ठ केला जावा. विज्ञानाला पुष्टी दिली जावी व त्याच्या मार्गदर्शनात मानवजातीची, तसेच संस्कृतीचा विकास चालू राहू शकेल.
युरोपीयन वैज्ञानिकांचे धर्माशी वैर असण्याचे खरे कारण हे होते. धर्माविरुद्ध असणारे काही मुस्लिम या खऱ्या कारणाला समजून घेत नाहीत, तसेच पूर्व व पश्चिमेतील परिस्थितीचा फरक लक्षात घेत नाहीत व धर्माला विरोध करीत असतात. त्यांचा विरोध एखाद्या गंभीर चितन व विचारांती नसतो, किबहुना तो युरोपच्या अंधानुकरणाचे अपत्य आहे. त्यांच्यासमीप विकास व उन्नतीचा तोच एकमेव मार्ग आहे ज्या मार्गाने युरोपियन राष्ट्रे जात आहेत. म्हणून आम्हालाही धर्माची कास सोडून दिली पाहिजे. असे नाही केले तर लोक आम्हाला प्रतिगामी व मागासलेले म्हणून टोमणे मारतील.
दुर्दैवाने हे लोक विसरतात की युरोपियन विद्वानांमध्येही धर्मविरोधाच्या बाबतीत पूर्वी एकमत आढळत नाही. तसेच आताही पूर्ण एकमत आढळत नाही. याउलट काही मोठे विद्वान या निरीश्वरवादी संस्कृतीला विटून हे सत्य उघडपणे बोलू लागले आहेत, की धर्म ही मानवाची अनिवार्य मानसशास्त्रीय व बौद्धिक गरज आहे.
युरोपियन विद्वानांची साक्ष
या विद्वानात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जेम्स जीन्स प्रमुख आहे. जेम्सच्या जीवनाचा आरंभ एक निरीश्वरवादी व प्रत्येक विषयात शंकादृष्टी ठेवणाऱ्या युवकाच्या रुपात झाला. पण आपल्या अनेक वैज्ञानिक शोधांनंतर शेवटी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचला की धर्म ही मानवी जीवनातील अनिवार्य गरज आहे, कारण ईश्वरावर आस्था बाळगल्याविना विज्ञानाच्या मूळ समस्या उलगडल्या जाऊ शकत नाहीत. हा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जेम्स जीन्ज धर्माच्या समर्थनार्थ इतका पुढे गेला, की त्याने जडवाद व अध्यात्मावाद या दोघांच्या समन्वयावरील विश्वास व आचरण यांचा समतोल एकत्रित करण्याच्या पद्धतीवर इस्लामची उघडपणे स्तुती केली. इंग्लंडचे प्रसिद्ध साहित्यिक ‘समर्सेटमॉम’ने धर्माच्या बाबतीत आजच्या युरोपातील नकारात्मक भूमिकेला या शब्दांत संबोधिल आहे, ‘‘युरोपने आपल्याकरिता एक नवीन ईश्वर ‘विज्ञान’ शोधून काढले आहे आणि जुन्या ईश्वरापासून तोंड फिरविले आहे.’’
युरोपचा नवा ईश्वर
परंतु युरोपचा हा नवीन ईश्वर मोठा ‘‘परिवर्तनवादी’’ निघाला आहे. हा प्रत्येक क्षणी बदलत असतो व त्याचा दृष्टिकोन नेहमी बदल व स्थित्यंतर करण्याकडे असतो. एखाद्या गोष्टीला तो आज ‘सत्य’ मानतो, तर उद्या खोटे, असत्य व फसगत असे म्हणून टाकतो. परिवर्तनाचे हे चक्र असे चालतच राहते. ते कधी संपत नाही आणि त्याचे भक्त नेहमी त्रासलेले असतात. अशा तऱ्हेच्या परिवर्तनशील व प्रत्येकक्षणी बदलणाऱ्या ईश्वराच्या छत्राखाली ते आणखी वेगळी कसली आशा करू शकतात. आजचे पाश्चिमात्य जगत बेचैनी व असंतोषाच्या मेघांनी झाकोळलेले आहे. ते अनेक मानसिक व मानसशास्त्रीय रोगांचे बळी होत आहेत. ती त्यांच्या मूळ आध्यात्मिक रोगाची बाह्यचिन्हे होत.
विज्ञानाचे नवे जग
विज्ञानाला ईश्वरपद बहाल करण्याच्या कृतीचा आणखी एक असा परिणाम निघाला आहे की जेथे तुम्ही आम्ही राहतो, हे जग कुठल्याही स्पष्ट उद्देशापासून अथवा ध्येयापासून बिलकूल वंचित झाले आहे. त्याचा कुठलाही उच्च उद्देश नाही, व्यवस्था नाही तसेच कोणतीही श्रेष्ठ सत्ता वा शक्ती येथे अस्तित्वात नाही, जिच्याद्वारे जगाचे मार्गदर्शन होऊ शकेल. येथे परस्परविरोधी शक्तींमध्ये सतत संघर्ष चालू आहे व येथील प्रत्येक वस्तू परिवर्तनाचे लक्ष्य आहे. आर्थिक पद्धती असो की राजनैतिक तसेच राज्य आणि व्यक्तीचे संबंध असो, येथील प्रत्येक गोष्ट बदलत असते इथपर्यंत की वैज्ञानिक सत्येही बदलतात. उघड आहे की या अंधकारमय व भयानक जगात, मानवाला सततच्या त्रास, बेचैनी व असंतोषाखेरीज काही प्राप्त होऊ शकत नाही. विशेषकरुन अशावेळी जेव्हा वातावरण एखाद्या उच्चतम सत्तेच्या कल्पनेशीही अनभिज्ञ आहे. गुंतागुंतींनी जीवनातील अडचणींनी, दुखांनी पीडित झालेल्यांना व गांजलेल्यांना त्याच्या पदराखाली शरण जावून आश्रय घेतल्याने सुख व शांती प्राप्त होऊ शकेल.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *