Home A मूलतत्वे A आखिरत (पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत

आखिरत (पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत

Islam

आखिरत(पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत असे आहे की या संसाराचा त्याग करून पूर्णपणे एकान्त ग्रहण करावा आणि जग व जगातील सर्व रूचि आणि इच्छा-आकांक्षापासून स्वतःला मुक्त करून वन, पर्वत आणि गुफांमध्ये जीवन व्यतीत करावं.
भारतीय मतांपैकी जैन मतानेदेखील यालाच मान्यता दिली आहे. सर्वांत महान गुरू स्वामी महावीर यांनी संसाराचा त्याग करून त्यागी जीवन अंगीकारले आणि या संसारापासून स्वतःला इतके अलिप्त ठेवले की या जगातील वस्त्राचा एक धागा सूत देखील आपल्या शरीराला स्वीकार करू दिला नाही. ते पूर्ण नग्नावस्थेत राहात. म्हणून त्यांचे अनुयायी जे भक्ती आणि दास्यतेचे सर्वोच्च पद प्राप्त करू इच्छितात, स्वामी महावीरांचे अनुकरण करून पूर्णपणे नग्न राहणे आपल्यासाठी अनिवार्य समजतात. आणि जगातील कोणतीही साधन-सामुग्री स्वतः जवळ ठेवीत नाहीत.
याच पध्दतीने बौध्द धर्माच्या दृष्टिकोनातूनदेखील मोक्ष आणि सफलतेकरिता हे आवश्यक आहे की संसार आणि संसारातील प्रत्येक वस्तूपासून मानवाने आपले संबंध तोडून टाकावे, याकरिताच या धर्माचे संस्थापक महात्मा बुध्द यांनी आपले माता-पिता, पत्नी आणि सन्तान आणि सिहासनाचा त्याग करून संन्यास ग्रहण करून टाकले आणि यालाच मुक्तीचे साधन ठरविले.
खुद्द हिंन्दू धर्मामध्ये जीवनयात्रेच्या ज्या टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातला पहिला टप्पा ज्ञानार्जनाचा आहे, दुसरा घर-गृहस्थी, त्यानंतर वानप्रस्थाचा टप्पा आणि येतो तो पूर्णपणे संन्यासाचा टप्पा आहे. मनुस्मृतीत नमूद आहे की ज्या वेळी माणसाच्या डोक्याचे केस पांढरे दिसू लागतात आणि त्वचेत सुरकुत्या पडू लागतात आणि त्याचा मुलगा स्वतः पुत्रवान होतो, त्या वेळी त्याने वनात आपले निवास ग्रहण केले पाहिजे, सर्व प्रकारचे नगर-आहार, वस्त्रादि सर्व प्रकारच्या उत्कृष्ट पदार्थांचा त्याग करावा आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलांजवळ सोडून द्यावं किवा तिलादेखील आपल्याबरोबर जंगलात घेऊन जीवन व्यतीत करावं. परंतु हे वनप्रस्थ-आश्रमात आहे. संन्यासाच्या आयुष्यात पत्नीला बरोबर ठेवण्याचा आणि कोणताही सांसारिक संबंध ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जर कोणी धर्मपरायण आणि संन्यासी व्यक्ती बाल्यावस्थेनंतर लगेच संन्यास ग्रहण करून गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रमचा अंगीकार करीत नाही तर या गोष्टीलाही पूर्ण वाव आहे. उलटपक्षी काही स्थितींमध्ये तर ते अधिक उत्तम आणि श्रेष्ठ समजले गेले आहे. परंतु याउलट इस्लाम या जगात राहून आणि त्यातील ईशदेणग्यांचा लाभ उचलण्याचा पारलौकिक मोक्षप्राप्तीत कोणताही अडथळा समजत नाही. उलटपक्षी इस्लाम तर याकरिताच अवतरला आहे की त्याने मानवाला या जगात राहणे शिकवावे. इस्लाम तर आपल्या सिद्धान्तांद्वारा शासन चालवायलादेखील एक पुण्य-कर्म आणि पारलौकिक मुक्तीचे साधन मानतो.
हदीस(प्रेषित कथन) च्या पुस्तकांपैकी सही बुखारी आणि मुस्लिम यांची प्रसिध्द हदीस आहे. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद(स.) सांगतात, सात लोक आहेत, ज्यांना अल्लाह(अंतिम न्यायदिवशी) आपल्या कृपेच्या छत्रछायेखाली जागा देईल. अशा वेळी जेव्हा त्याच्या छायेशिवाय अन्य कोणतीही छाया राहणार नाही. नंतर त्या सात व्यक्तींचे वर्णन करताना सर्वप्रथम फरमावले, ‘‘न्यायदान करणारा शासक.’’
इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मानवाचे मार्गदर्शन करते. म्हणून याच्या सर्व शिकवणुकी त्याच लोकांकरिता आहेत जे या संसारात राहतात आणि संसाराच्या प्रशासनास चालवतात. त्या लोकांकरिता मुळीच नाही जे जगापासून दूर राहून जंगल, पर्वत आणि आश्रमाचे मार्ग पत्करतात. आचरण आणि चारित्र्याची महानता आणि गुण जगातील लोक आश्रम आणि मठांमध्ये शोधतात, इस्लाम त्यांना प्रत्यक्ष जीवनाच्या दगदगीत आणि व्यवहारामध्ये आणू इच्छितो. इस्लामची इच्छा आहे की जगातील सर्वच लोक मग त्यांचा संबंध कोणत्याही क्षेत्राशी असो, स्वतःमध्ये इस्लामचे अभिष्ट गुण आत्मसात करू इच्छितो मग तो शासक असो अगर प्रजा, न्यायधीश असो अगर लोकसभा सदस्य, लष्कर अगर पोलिस असो अगर जनता किंवाशिक्षक असो अगर विद्यार्थी. तात्पर्य असे की तो जो कोणीही असो, त्या सर्वांनी ते गुण आत्मसात करावेत, ज्याची शिकवण इस्लाम देतो.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *