माननीय उम्मुल आला (रजि.) यांचे कथन आहे.
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल, जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
एका दीर्घ हदीसकथनाचा हा एक भाग आहे. माननीय उस्मान बिन म़जऊन (रजि.) यांच्या निधनानंतर उम्मुल आला (रजि.) यांनी त्यांना संबोधन करून सांगिले, ‘‘हे अबू साएब, तुम्हावर अल्लाहची कृपा. मी साक्ष देतो की अल्लाहने तुम्हाला अनुग्रहित केले आहे.’’
यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तुम्हाला कसे माहीत झाले की अल्लाहने त्यांना अनुग्रहित केले?’’
माननीय उम्मुल आला (रजि.) म्हणाल्या, ‘‘माझे माता-पिता तुमच्यावर कुर्बान! मला माहीत नाही की (त्यांना अनुग्रहित केले जाणार नाही). तर कोण आहे ज्यावर अनुग्रह होईल?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘उस्मानचे तर निधन झाले, त्यांच्याविषयी चांगले विचार व इच्छा माझ्या मनातसुद्धा आहे.’’
यानंतर पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’
अर्थात, अल्लाहचा प्रताप व महानतेची निकड आहे की आम्ही त्याची भीती (ईशभय) बाळगावे, अल्लाहची पकड आणि अल्लाहच्या प्रकोपाविषयी आम्ही कधीही बेफिकीर राहू नये. ईश्वराशी चांगल्या आशा-आकांक्षा बाळगू शकता, परंतु खात्रीने कोणाविषयी काही सांगणे योग्य नाही.
0 Comments