Home A प्रेषित A ‘खैबर’चे युद्ध

‘खैबर’चे युद्ध

‘जिल्हज्ज’ महिन्यात प्रेषित मुहम्मद(स) ‘हुदैबिया’ वरुन परत आले. काही दिवस ‘मदीना’मध्ये घालविल्यानंतर ‘मुहर्रम’च्या सुरुवातीस ‘खैबर’कडे कूच केले. ही गोष्ट लक्षणीय आहे की, ‘ज्यू’ समाजाचे लोक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स), मुस्लिम समुदाय आणि इस्लामी शासनाविरुद्ध सतत कटकारस्थाने रचण्यात मग्न होते. मदीना समझोता कराराचे उल्लंघन करणे, मुस्लिम शत्रूपक्षांशी संबंध वाढवून त्यांना मदत करणे, मुस्लिमांमध्ये उपद्रव माजविणे, प्रेषितांसंबंधी अनादरयुक्त चर्चा करून वातावरण गढूळ करणे, प्रेषितांच्या चर्चासभेत हेर पाठवून प्रेषितांचे मनसूबे शत्रूंना कळविणे व न्यायव्यवस्थेत बाधा निर्माण करणे, युद्धप्रसंगी जवाबदार्यांना बगला दाखविणे व यासारख्या अनेकानेक अपराधी कारस्थानात ते गुंतलेले असायचे. या सर्व बाबींवर विस्तारभयास्तव चर्चा टाळण्यात येत आहे. फक्त प्रेषितांच्या हत्येचे कारस्थान आणि षडयंत्र जरी पाहिले, तर ही बाब स्पष्ट होते की, प्रेषित, इस्लामी आंदोलन आणि इस्लामी राज्यासाठी हे किती घातक होते? शेवटी एके दिवशी प्रेषित चौदाशे पायदळ आणि दोनशे स्वार एवढी फौज घेऊन खैबरच्या मार्गावर निघाले. ‘मदीना’मध्ये माननीय सवाअ बिन अर्तफा(र) यांना आपले प्रतिनिधी नियुक्त केले. इस्लामी ध्वज माननीय अली(र) यांच्या हाती दिला. प्रेषितभार्या माननीय उम्मे सलमा(र) आणि काही इतर स्त्रियासुद्धा लष्करासोबत होत्या. पुढील तुकडीचे प्रमुख माननीय उकाशा(र) आणि उजव्या हाती असलेल्या तुकडीचे प्रमुख माननीय उमर(र) होते.
मुजाहिदीन (धर्मयोद्धयांचे) चे हे लष्कर ‘रजीअ’ या स्थानावर उतरले. हे स्थान ‘गतफान’ आणि ‘खैबर’च्या मध्यभागी होते. ‘गतफान’वासीयांना इस्लामी लष्कराची खबर मिळताच ते खैबरवासीयांच्या मदतीसाठी तयार झाले. परंतु त्यांनी विचार केला की, आपण खैबरवासियांच्या मदतीस गेल्यावर आपल्या वस्तीचे संरक्षण कोण करील? म्हणून ते परत फिरले.
आदरणीय प्रेषितांनी असा निर्णय घेतला की, याच जागेवर लष्कराचा तळ राहील आणि वेगवेगळ्या तुकड्या शेजारील वस्त्यांत जाऊन लष्करी कारवाया करतील. माननीय उसमान(र) यांना या केंद्रीय तळाचे प्रमुख नियुक्त केले. स्त्रिया आणि रसद याच ठिकाणी ठेवण्यात आले.
पहिला हल्ला माननीय महमूद बिन मुस्लिमा(र) यांनी ‘नाईम’ किल्ल्यावर केला. परंतु किल्ला फत्ते होण्याच्या एक दिवस पूर्वी ‘माननीय महमूद’ किल्ल्याच्या भितीच्या सावलीत विश्रांतीसाठी पहुडले. तेव्हा वरून एका ‘ज्यू’ ने जात्याचे पाटे त्यांच्या अंगावर टाकले व त्यात ते शहीद झाले. मग मोठे बंधु ‘माननीय इब्ने मुस्लिम(र)’ यांनी मुजाहिदीन (इस्लामी सैनिक) चे नेतृत्व सांभाळले व किल्ला सर केला. याच दरम्यान ‘साब’ किल्लासुद्धा इस्लामी लष्कराच्या ताब्यात आला. या किल्ल्यास माननीय खब्बाब बिन मुंजिर(र) यांच्या नेतृत्वाखाली वेढा देण्यात आला. या किल्ल्यातून भरपूर युद्ध सामग्री आणि संपत्ती इस्लामी लष्कराच्या हाती लागली. त्याचप्रमाणे ‘नुतात’ हा किल्ला जिकण्यासाठी खूप अवघड होता. परंतु किल्ल्यातील एका ‘ज्यू’ माणसाने किल्ल्यात शिरण्याचा गुप्त मार्ग दाखविला आणि किल्ला सर झाला. अशाच प्रकारे ‘शन’ आणि ‘बर्र’ हे किल्लेसुद्धा सर झाले. ‘कमूस’चा किल्ला सर करण्यात काही अडचणी मात्र आल्या. वीस दिवसांचा सतत वेढा देऊनसुद्धा काही निष्पन्न होताना दिसत नसल्याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी इस्लामी सैन्यास संबोधित करून म्हटले, ‘‘उद्या लष्कराचा झेंडा मी त्या माणसाच्या हाती देईन ज्यावर ईश्वर आणि प्रेषितांचे विशेष प्रेम आहे. दुसर्या दिवशी सकाळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय अली(र) यांना बोलावून त्यांना लष्कराचा ध्वज देऊन म्हटले, ‘‘जा आणि ईश्वराच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध) करा. सुरुवातीस इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण द्या आणि नंतर युद्ध करा!’’ तसेच इस्लामी राज्याच्या मौलिकनीती हा सामान्य कायदा स्पष्ट करून म्हटले की, ‘‘तुमच्यामार्फत केवळ एका व्यक्तीने जरी इस्लाम धर्म स्वीकारला, तर ते अगणित धन व संपत्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ होय.’’ या वाक्यावरून स्पष्ट होते की, इस्लामी राज्याचा हा मुळीच हेतु नव्हे की अमाप संपत्ती, जय आणि राज्यास विस्तार प्राप्त व्हावा. उलट इस्लामी राज्याचा हा हेतु मुळात एवढाच आहे की, मानवांस ईहलोक आणि परलोकात यश मिळावे.
इस्लामी लष्कराचा ध्वज हाती येण्याचे हे सौभाग्य माननीय अली(र) यांना प्राप्त झाले आणि ईश्वराच्या विशेष कृपेमुळे हा किल्ला इस्लामी लष्कराने सर केला. या पाठोपाठ ‘अल कैतिबा’, ‘वल वतीह’ आणि ‘अस्सलालम’ किल्लेही ताब्यात आले आणि ‘ज्युडिशीयन्स’ ची उरलीसुरली शक्ती नष्ट झाली. आता ‘ज्युडिशीयन्स’ यांनी हत्यार टेकले आणि आत्मसमर्पण करून प्रेषितांना दयेचे मागणी केली. कृपाळू प्रेषितांनी त्यांना माफी दिली.
याच प्रसंगी ‘ज्युडिशीयन्स’ चा सरदार ‘मरहब’च्या बहिणीने प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या सोबत्यांना भोजनाचे निमंत्रण देऊन अन्नामध्ये विष कालवले. जेवणाचा पहिला घास मुखापर्यंत येताच प्रेषितांना कळाले की, अन्नात विष टाकण्यात आले आहे. त्यांनी आपला हात रोखला आणि त्यांच्या अनुकरणास्तव त्यांच्या सोबत्यांनीसुद्धा जेवण बंद केले. केवळ माननीय बिशर बिब करा(र) यांच्यावर विषाचा प्रभाव पडून ते मरण पावले. हे कटकारस्थान सिद्ध होऊनसुद्धा प्रेषितांनी त्या स्त्रीस क्षमा दिली.
‘खैबर’च्या युद्धात १८ मुस्लिम सैनिक शहीद आणि ५० जखमी झाले. तसेच शत्रूपक्षातील मरणार्या सैनिकांची संख्या ९३ होती. ‘ज्युडिशीयन्स’चा या युद्धात पराभव झाला आणि त्यांना इस्लामी शासनात रयतेचा दर्जा देऊन रीतसर नागरिकत्व प्रदान करण्यात आले.
काही ‘ज्युडिशीयन्सनी’ इस्लामचा स्वीकार केला. त्यांच्यापैकी ‘अस्वद दराई’ नावाचा एक गुराखी होता. त्याने युद्धाचे नेमके कारण विचारले. त्यावर ‘ज्यू’ लोकांनी सांगितले की, ‘‘मुहम्मद(स) यांनी प्रेषित्वाचा दावा केला आहे.’’ तो सरळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दरबारी हजर झाला. आणि प्रेषितांना विचारले,
‘‘आपली शिकवण काय आहे?’’
‘‘एकमेव ईश्वरच उपासनेस पात्र असून मी ईश्वराने पाठविलेला प्रेषित होय.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून तो तत्काळ मुस्लिम झाला. याच प्रसंगी ‘माननीय जाफर बिन अबू तालीब(र)’ हे आपल्या कित्येक मित्रांसह ‘अॅबीसिनीया’हून परतले.
‘खैबर’ सर झाल्यानंतर ज्युडिशियांचा ‘कुरा’चा खाडीत आणखीन एक गड होता. तो गडसुद्धा काही दिवसांत इस्लामी सैन्याने सर केला.
यानंतर ‘गत्फान’, ‘मुहारिब’, ‘सालबा’ आणि ‘अनमार’ हे कबिले इस्लामी शासनावर हल्ला करीत असल्याची प्रेषितांना खबर मिळाली. प्रेषित चारशे योद्ध्यांची फौज घेऊन निघाले आणि शत्रूंनी युद्धभूमीवरून पळ काढला. या मोहिमेस ‘जातुर्रिकाअ’चे युद्ध म्हटले जाते.
हुदैबिया समझोत्यानुसार ‘कुरैश’जणांकरिता ‘सीरिया’चा राजमार्ग मोकळा झाला होता. परंतु ‘माननीय अबू जुंदल(र)’ हे कुरैशच्या कैदेतून पळून आले. ‘समझोत्यानुसार प्रेषितांनी त्यांना ‘मदीना’मध्ये आश्रय न दिल्यामुळे त्यांनी एका पर्वतावर जाऊन आश्रय घेतला. त्यांनी कुरैशच्या एका काफिल्यावर हल्ला चढवून त्यांची मालमत्ता काबीज केली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिफारशीनुसार त्यांनी ही संपत्ती परत केली. त्यांच्याबरोबर आणखीन काही कुरैशपीडित तरूणांनी पळ काढून ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांचा आश्रय घेतला. या वेळी कुरैशजणांना खूप पश्चात्ताप होऊ लागला की, जी शर्त त्यांनी स्वतःसाठी लाभदायक समजली होती, त्यामुळेच त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. अशा प्रकारे हुदैबियाच्या समझोत्याचा लाभदायक पैलू समोर आला.

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *