मुहम्मद (स.) एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करू लागले. चाळिशी नुकतीच संपली होती आणि आयुष्याचा उरलेला भाग आता ईश्वरदत्त महान कार्यासाठी ते अर्पण करू लागले आणि त्याच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला? त्याच्याजवळच्या मंडळींनी, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाही. हा ईश्वरी पुरुष आहे असे त्यांना वाटले. त्यातही सर्वांत आधी खदीजा (रजि.) ती पहिली अनुयायी, पैगंबर मुहम्मद (स.) यांस ईशज्ञान झाले आहे असे जर कोणी पाहिल्याने विश्वासपूर्वक मानले असेल तर ते खदीजाने. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक ईश्वराची, मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदीजा (रजि.) यांनी मुहम्मद (स.) यांच्या ईश्वरी जीवनकार्यावर तिनेच प्रथम श्रद्धा ठेवली. इतकेच नव्हे तर पुढील विवादात तिने त्यांना सदैव धीर दिला. जेव्हा ते कावरेबावरे होऊन त्या रात्री तिच्याकडे आले व ‘‘खदीजे, खदीजे; पांघरुण घाल माझ्यावर, कपड्यात लपेट मला.’’ असे म्हणाले त्यावेळेस ईश्वराने खदीजेच्या रूपानेच जणू त्यांना धीर दिला, शांती दिली. तीच त्यांना म्हणाली, ‘‘उठा.’’ तिनेच त्यांचा बोजा हलका केला. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल ते बडबडू द्या. लक्ष नका देऊ, असे म्हणाली. ईश्वराने ज्ञान दिले, खदिजेने शांती व विश्वास दिला. दुसरे अनुयायी अली (रजि.) व तिसरा अनुयायी जैद (रजि.) झाला. तो गुलाम, ज्याला मुहम्मद (स.) यांनी एकदम मुक्त केले होते, त्याने हा नवधर्म घेतला आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबू बकर (रजि.), ते मक्केतील श्रीमंत व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे होते. मुहम्मद (स.) यांना ‘अल्-अमीन’ म्हणत, तसे यांना ‘अस्-सिद्दीक’ म्हणजे सच्चा असे म्हणत. मुहम्मद (स.)याहून दोनच वर्षांनी ते लहान होते. त्यांना काबाचा सेवक असेही म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषाने हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पाच या नवधर्मात आले. अबू बकर (रजि.) पुढे खलीफा झाले. तसेच पुढे खलीफा होणारे उस्मान (रजि.) हे मिळाले. उस्मान (रजि.) हा प्रतिस्पर्धी उमैया घराण्यातील होता. दुसरा अब्दुल रहमान (रजि.), तिसरा साद (रजि.)- ज्याने पुढे इराण जिंकून घेतला. चौथा खदीजा (रजि.) चा नातलग जुबैर (रजि.) आणि पाचवा तो शूर लढवय्या तल्हा (रजि.). उस्मानने नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनी उस्मान (रजि.)ला बांधले व विचारले, ‘‘पूर्वजांच्या धर्मापेक्षा तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तू घेत आहेस तो जोपर्यंत तू सोडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.’’ परंतु उस्मान (रजि.) उत्तरला, ‘‘त्या ईश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतो, की तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाही!’’
काही अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलही मिळाले. मक्केतील काही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हब्शी ‘बिलाल’(रजि.) इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहम्मद (स.) प्रेमाने म्हणत, ‘‘बिलाल म्हणजे अॅबिसिनियाचे सर्वोत्तम फळ आहे!’’
मुहम्मद (स.) यांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहम्मद (स.) यांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ती, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींना मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहम्मद (स.) यांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायींनी छळ सहन केले. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दु:खे सहन केली. बहिष्कार, मरण यांनाही तोंड दिले. मुहम्मद (स.) यांच्या ठायी त्यांना यत्किंचितही काळे दिसते तर अशी अडग श्रद्धा जन्मेल का? खिस्तावर त्यांच्या भावांचा जवळच्या मंडळींचा यत्किंचितही विश्वास नव्हता. परंतु मुहम्मद (स.) या बाबतीत दैववान होते. मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयीच्या अत्यंत प्रामाणिकपणाची खूण आहे.
त्यांनी उस्मान (रजि.)ला बांधले व विचारले, ‘‘पूर्वजांच्या धर्मापेक्षा तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तू घेत आहेस तो जोपर्यंत तू सोडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.’’ परंतु उस्मान (रजि.) उत्तरला, ‘‘त्या ईश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतो, की तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाही!’’
काही अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलही मिळाले. मक्केतील काही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हब्शी ‘बिलाल’(रजि.) इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहम्मद (स.) प्रेमाने म्हणत, ‘‘बिलाल म्हणजे अॅबिसिनियाचे सर्वोत्तम फळ आहे!’’
मुहम्मद (स.) यांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहम्मद (स.) यांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ती, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींना मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहम्मद (स.) यांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायींनी छळ सहन केले. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दु:खे सहन केली. बहिष्कार, मरण यांनाही तोंड दिले. मुहम्मद (स.) यांच्या ठायी त्यांना यत्किंचितही काळे दिसते तर अशी अडग श्रद्धा जन्मेल का? खिस्तावर त्यांच्या भावांचा जवळच्या मंडळींचा यत्किंचितही विश्वास नव्हता. परंतु मुहम्मद (स.) या बाबतीत दैववान होते. मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयीच्या अत्यंत प्रामाणिकपणाची खूण आहे.
0 Comments