त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे.
निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे.
म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे.
म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठी
इच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-
यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो.
जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.
0 Comments