Home A परीचय A विरक्ती

विरक्ती

निरीक्षणाबरोबर अनुमान व भ्रामक कल्पनेच्या साहाय्याने निश्चित केले जाणारे दुसरे मत असे की, हे जग आणि ते शरीर मानवासाठी एक यातनागृह आहे. मानवाचा आत्मा एक शिक्षा भोगणारा कैदी म्हणून या बंदीगृहात कैद केला गेला आहे. सुखोपभोग, इच्छा व वासना आणि त्यासंबंधीने मानवाला भासणाऱ्या सर्व गरजा वास्तविकता या बंदीगृहाची साखळदंड आहेत. मनुष्य जितका या जगाशी व या जगातील वस्तूंशी संबंध ठेवील तितका जास्त तो या साखळदंडात अडकत जाणार आणि अधिक प्रकोपास पात्र ठरणार. मुक्तीचा मार्ग याशिवाय अन्य कोणताच नाही की, जीवनाच्या सर्व भानगडींपासून संबंध तोडले जावेत, इच्छा व वासना नष्ट केल्या जाव्यात, सुखोपभोगाशी काडीमोड घेतली जावी, शारीरिक गरजा आणि वासनापूर्तला नकार दिला जावा, रक्त व मांसाच्या संबंधामुळे निर्माण झालेले सर्व प्रेम मनातून बाहेर घालविले जावेत आणि आपला शत्रू म्हणजे मन व शरीराला इंद्रिय दमन आणि घोर तपश्चयेंद्वारे इतक्या यातना दिल्या जाव्यात की आत्म्यावर त्यांचे नियंत्रण राहू नये. अशाप्रकारे आत्मा हलका आणि स्वच्छ व निर्मळ होईल. त्यामुळे त्याला मुक्तीच्या उƒ स्थानाप्रत उÈाण घेण्याची शक्ती प्राप्त होईल.
या मतानुसार जे वर्तन निर्माण होते त्याची गुणवैशिष्टये अशी-
पहिले असे की, त्यामुळे माणसाची एकूण प्रवृत्ती व त्याचा कल सामूहिकतेकडून वैयक्तिकतेकडे आणि संस्कृतीकडून रानटी अवस्थेकडे वळतो. तो जग आणि जागतिक जीवनापासून तोंड फिरवून उभा राहतो. जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. त्याचे संपूर्ण जीवन असहकार आणि असहयोगाचे जीवन बनते. त्याचे आचरण जास्त करून नकारात्मक  स्वरूपाचे होते.
दुसरे असे की, या मतामुळे सदाचारी लोक जगाच्या व्यवहारापासून दूर होऊन आपल्या मुक्तीच्या काळजीत एकांतवासाकडे धाव घेतात आणि जगाचे सर्व व्यवहार दुष्ट लोकांच्या हातात येतात.
तिसरे असे की, या मताच्या संस्कृतीवर जितक्या प्रमाणात प्रभाव होतो तितक्याच प्रमाणात लोकांत नकारात्मक नीतिमत्ता, असंस्कृतपणा आणि व्यक्तिगत स्वरुपाच्या प्रवृत्ती आणि निराशात्मक विचार निर्माण होतात, म्हणून प्रत्येक अत्याचारी सत्ता त्यांना सहजपणे नियंत्रणात आणू शकते. खरे म्हणजे हा दृष्टिकोन सामान्यजणांना अत्याचारापुढे लोटांगण घालणारे बनविण्यात जादूसमान प्रभाव राखतो.
चौथे असे की, मानवी स्वभावाशी या विरक्तिवादी दृष्टिकोनाचा सतत संघर्ष होत राहतो, त्यात बव्हंशी या दृष्टिकोनाचा पराभवच होत असतो. मग जेव्हा याचा पराभव होतो तेव्हा आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्याला निमित्तांच्या छत्राखाली आश्रय ¿यावा लागतो. म्हणून कोठे प्रायश्चित्ताचे तत्त्व निर्माण होते, कोठे भौतिक प्रेमाचे सोंग भरले जाते तर कोठे संन्यासाच्या पडद्याआड असा भोगवाद अवलंबिला जातो की, ज्याची भौतिकवादींनासुद्धा लाज वाटावी.
संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *