Home A प्रेषित A पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रुंप्रति व्यवहार

पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रुंप्रति व्यवहार

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट अगदी प्रखरपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रेषितांनी त्यांच्या कोणत्याही शत्रुशी वैयत्तिक बदला घेतला नाही, कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही. मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांच्यावर विरोधकाकडून अन्याय, अत्याचार आणि निष्ठूरतेचे पर्वत कोसळले. इतिहासात कधीही न दिसणारा अन्याय व अत्याचार मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांवर व जवळच्या नातलगांवर करण्यात आला. त्यांना घर, परिवार आणि मायभूमी त्यागण्यासाठी विवश केले, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, आपली प्रिय मायभूमी अर्थात मक्का शहर त्यागून मदीनेस प्रस्थान करण्यास भाग पाडले. मदीना शहरी जाण्यापूर्वी प्रेषितांचा जीव काबागृहात अडकलेला होता. जाताना दर्शन घेण्याची त्यांची तीप इच्छा होती. मात्र विरोधकांकडून अन्याय व अत्याचारांमुळे काबागृहाचे दार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. काबागृहाच्या विश्वस्ताने काबागृहाच्या दर्शनासाठी दरवाजाच्या चाव्या देण्यास नकार दिला. मात्र इतिहास साक्षी आहे की ज्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना काबागृहाच्या अंतिम दर्शनासाठी चावी देण्यास नकार दिला होता, मक्केवर जबरदस्त विजय मिळविल्यावर प्रेषितांनी त्यांच्यावर सूड न उगविता त्यांच्याच हाती चावी दिली. एवढेच नव्हे तर दयाळू व कृपाळू मुहम्मद (स.) यांनी त्यांना आशीर्वाद दिला की ही चावी त्यांच्याच वंशात असेल. हे इतिहासातील अप्रतिम औदार्य आहे.
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांचा छळ सुरूच होता. मात्र प्रेषितत्व कार्याचे वारे मदीना शहरात वाहत होते आणि तेथे इस्लामचा प्रचार होत होता. विरोधकांना मात्र हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी प्रेषितांचा प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित (स.) भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसरन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते, तो जीवलग मित्र बनला आहे.”(कुरआन – ४१:३४)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विश्वाच्या आणि जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवांना कोणताही भेदभाव न पाळता समान रूपाने सत्यधर्माचा परिचय करून देण्याचे महान कर्तव्य पार पाडले. यात त्यांनी आपला-परका, मित्र-शत्रु असा मुळीच भेदभाव केला नाही. याशिवाय प्रेषितांनी असेही सुचित केले की नेकी, चांगुलपणा आणि भलाई व सदाचाराच्या कार्यात सर्वांचीच मदत करावी. त्याचप्रमाणे अन्याय व अत्याचाराच्या आणि दुष्कर्माच्या कार्यात कोणाची आणि कितीही जवळच्या माणसाचीही मुळीच गय न करता कोणत्याही प्रकारे मदत करू नये. कुरआनात ही बाब अशा शब्दांत सादर करण्यात आली आहे,
‘‘जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचारांची कामे आहेत, त्यात कोणाशीही सहकार्य करू नका.”(कुरआन – ५:२)
एके प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
‘‘ईश्वराने मला केवळ एवढ्यासाठीच पाठविले आहे की मी नैतिक गुणांना त्यांच्या परमोच्च स्थानावर पोचवावे आणि या कार्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवू नये.”(हदीस ग्रंथ)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रंजल्या-गांजल्यांना उराशी कवठाळले, बुडत्याला सहारा दिला, ठेचाळणार्यास हात दिला, अन्याय व अत्याचारपीडिताच्या हाकेवर धावून गेले, शोषित, पीडितांना प्रत्यक्ष न्याय मिळवून दिल्यावरच श्वास घेतला, काटाच काढण्याचे ठरविले. पूर्ण विचार-विमर्श केल्यानंतर त्यांनी असे ठरविले की प्रत्येक कबिल्यातून एका तरुणाची निवड करायची आणि मग त्या सगळ्यांकडून प्रेषितांची हत्या करायची. यामुळे या हत्येत सर्वच कबिले सामील असल्यासारखे होईल आणि या सर्वच कबिल्यांचा सामना करण्याचे धैर्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कबिल्यास होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्वच कबिल्यातील योद्धे गोळा झाले आणि प्रेषितांच्या घराला घेराव घातला. प्रेषित सकाळी घराबाहेर पडताच सर्वांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करायचे ठरले.
आणखीन एक लक्षणीय गोष्ट अशी की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सत्यधर्मविरोधी शत्रुंनादेखील त्यांच्या ईमानदारी आणि प्रामाणिकतेवर जबरदस्त विश्वास होता. याच विश्वासामुळे बर्याच लोकांच्या आणि शत्रुंच्यासुद्धा ठेवी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या होत्या. एखाद्यास आपली एखादी वस्तु, जिन्नस, द्रव्य, संपत्ती सुरक्षित ठेवावी वाटत असल्यास तो बिनधास्तपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे ठेवून निश्चिंत होत असे. अशा प्रकारे प्रेषितांकडे शत्रुंच्या बर्याच ठेवीदेखील सुरक्षिततेस्तव ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) यांना शत्रुंच्या कटकारस्थानाची माहिती मिळाली होती. त्यांनी माननीय अली (रजी.) यांना बोलावले आणि सांगितले की मला मक्का शहर सोडून मदीना शहरी प्रस्थान करण्याचा ईश्वरी आदेश झाला आहे. मी आज मदीना शहरी प्रस्थान करणार आहे. तुम्ही माझ्या पलंगावर माझी चादर पांघरून झोपावे. सकाळ होताच लोकांच्या ठेवी त्यांना सोपवाव्यात.
विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याकरिता येणार्या शत्रुंच्या ठेवी परत करण्यात येताहेत. ज्या रात्री प्रेषितांना ठार करण्याचा बेत आखण्यात आला, त्या रात्री प्रेषितांनी त्यांच्या ठेवी परत करण्याची पूर्ण व्यवस्था केली. हा प्रेषितांचा त्यांच्या जीवावर बेतलेल्या शत्रुंशी व्यवहार होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दया आणि कृपेचा जो व्यवहार केला आणि ज्या धर्मपरायण आचरणाचे प्रदर्शन केले, त्याचे उदाहरण इतरच कोठेही सापडणे शक्य नाही.
विरोधकांच्या अमानुष छळाला कंटाळून केलेल्या मदीना प्रस्थानाच्या दहा वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. ज्या विरोधकांनी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांचा अमानुषपणे छळ केला होता, त्यांचे जगणे कठीण केले होते, तीन वर्षांपर्यंतच्या सामाजिक व आर्थिक बहिष्कारांतर्गत अबू तालिब नावाच्या घाटीमध्ये ठेवून अन्न-पाण्यावाचून तडफडण्यासाठी सोडले होते, आज ते समस्त शत्रु पराजित होऊन थरथर कापत विजेता प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे होते. मात्र फक्त मित्रांसाठीच नव्हे तर शत्रुंच्याप्रतिसुद्धा दया आणि कृपा असलेल्या प्रेषितांनी कोणत्याही प्रकारे रक्तपात केला नाही. किंचितही त्रास दिला नाही. सर्वांना माफ केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविरुद्ध लढणार्या आणि क्रूर व अमानुष पाषाणहृदयी शत्रुच्या लष्कराचे नेतृत्व करणार्या अबू सुफियान (रजी.) यांना अभय दिले, मान दिला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळू व कृपाळू व्यवहार आणि महान चारित्र्याची या घटनेवरून कल्पना येते की पराजित झालेला शत्रुपक्ष त्यांच्या ताब्यात होता, भयाने थरथर कापत होता, त्यांच्याकडून कशारितीने बदला घेतला जाईल, हे सांगता येत नव्हते. मात्र प्रेषितांनी सर्वांना क्षमा केली, स्वतंत्र केले.
वहशी नावाची एक व्यक्ती मक्का शहरात होता. यानेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रिय काका हमजा (रजी.) यांचा वध केला होता. मक्का शहरावर प्रेषितांनी विजय मिळविल्यावर तो तेथून पळून गेला होता. त्यास वाटले होते की, प्रेषित त्यास क्षमा करणार नाहीत. मात्र जेव्हा त्यास प्रेषितांच्या शत्रुंच्या प्रति दया आणि कृपापूर्ण व्यवहाराची सूचना मिळाली, तेव्हा तो परत आला आणि प्रेषितदरबारी हजर झाला. प्रेषितांनी त्याला अभयदान दिले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी जीवनभर लढणार्या शत्रुंच्या लष्कराचा आणि मक्का शहराचा सरदार अबू सुफियान याची ‘हिंदा‘नावाची पत्नी होती. ती प्रेषितांविषयी अतिशय वैरभाव बाळगत होती. याच वैरभावापोटी तिने प्रेषितांचे प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येची वहशीला सुपारी दिली होती. हमजा (रजी.) यांचा वध झाल्यावर त्यांची छाती फाडून काळीज बाहेर काढून दातांनी चावले, त्यांच्या नाक-कानांचा हार गळ्यात घालण्याचे क्रौर्य दाखविले होते. मक्केवर प्रेषितांनी विजय प्राप्त केल्यावर तिने चेहर्यावर पडदा टाकला, जेणेकरून त्यांनी तिला ओळखू नये आणि सार्वजनिक क्षमादानात सामील होऊन जीव वाचवावा. मात्र प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तिला ओळखले. प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येसंदर्भात मुळीच उल्लेख न करता तिलाही माफ करून दया आणि कृपेचे दर्शन घडविले. प्रेषितांच्या या व्यवहारामुळे तिला भयंकर आश्चर्य वाटले. ती खूप प्रभावित झाली आणि इस्लामचा स्वीकार केला.
सफवान-बिन-उमैया ही कुरैशजनांतील प्रमुख व्यक्ती होती. इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कट्टर शत्रुंमध्ये त्याची गणना होत होती. यानेच उमैर-बिन-वहब यास मुहम्मद (स.) यांचा वध करण्यासाठी नियुक्त केले होते आणि बक्षीससुद्धा घोषित केले होते. मात्र प्रेषितांच्या मक्का विजयाची सूचना मिळताच त्याने पळ काढला आणि जद्दाला रवाना झाला. तेथून समुद्रमार्गाने तो येमेनला जाण्याचा विचार करू लागला. उमै-बिन-वहब याने प्रेषितांना सांगितले की सफवान-बिन-उमैया कबिल्याचा प्रमुख असून तो आपल्या भीतीने मक्का शहर सोडून पळून गेला आहे. यावर प्रेषितांनी त्यास अभयदान दिले. उमैर सरळ सफवान बिन उमैयास जाऊन भेटला आणि प्रेषितांच्या अभयदानाची खबर दिली. मात्र सफवानने सांगितले की ‘‘मला भीती वाटते. मी मुहम्मद (स.) यांना खूप छळल्याचे तुम्हाला माहीतच आहे. ते कसे काय मला क्षमा करतील?”
‘‘अद्याप तुम्ही मुहम्मद (स.) यांना ओळखलेच नाही! तुम्ही त्यांची सहनशीलता आणि औदार्य अजून पाहिलेच नाही.” उमैयाने सगळा प्रकार समजावून सांगितला. सफवान उमैर (रजी.) बरोबर प्रेषितांच्या सेवेत हजर झाले, म्हणाले, ‘‘आपण माझा गुन्हा माफ केला, मला अभयदान दिले, असे उमैरने सांगितले ते खरे आहे काय?”
‘‘होय! खरे आहे!” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले ‘‘मला दोन महिन्यांची मुदत द्यावी,” सफवानने विनंती केली.
‘‘मी तुम्हाला चार महिन्यांची मुदत देतो,” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले. यानंतर सफवान (रजी.) यांनी सहर्ष इस्लामचा स्वीकार केला.
याप्रमाणेच इस्लामचा कट्टर शत्रु असलेल्या अबू जहलचे पुत्र इक्रमा हे मक्केवर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विजयानंतर येमेनदेशी पळून गेले होते. त्यांच्या पत्नीने अगोदरच इस्लामचा स्वीकार केला होता. ती स्वतः येमेनला जाऊन नवर्याला भेटली आणि प्रेषितांकडून क्षमादानाचे आश्वासन दिले. यानंतर दोघे नवरा-बायको प्रेषितदरबारी हजर झाले आणि इक्रमा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळूपणा अनुभवला. प्रेषितांनी आपल्या कट्टर विरोधक आणि शत्रुच्या या पुत्रास उराशी कवटाळले आणि इक्रमा (रजी.) यांनी इस्लामचा स्वीकार केला.
अरब कबिल्यांपैकी बनी हनीफा हा कबिला इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधक होता. सुमामा बिन अस्साल या कबिल्याचे प्रमुख होत. त्यांना मुस्लिमांनी अटक केली होती. प्रेषितांच्या आदेशाने त्यांना मस्जिदच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास विचारले,
‘‘कसे आहात ‘सुमामा?”
‘‘हे मुहम्मद (स.)! मी ठीक आहे. तुम्ही जर माझी हत्या केली तर समजा एका कबिल्याच्या सरदाराची हत्या होईल आणि जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धन पाहिजे असल्यास तेही मिळेल!”
सुमामांचे उत्तर ऐकून प्रेषित मुहम्मद (स.) तसेच निघून गेले. दुसर्या दिवशी…
‘‘कसे आहात सुमामा?” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले.
‘‘मी तसाच आहे, जसा काल होतो! जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धनसुद्धा मिळेल!!”
प्रेषित मुहम्मद (स.) परत निघून गेले. यानंतर तिसर्यांदा प्रेषित त्यांच्याकडे आले आणि विचारपूस केली, त्यांनी परत तेच उत्तर दिले. यावेळी मात्र प्रेषितांनी त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सुमामांना प्रेषितांकडून याच दयापूर्ण व्यवहाराची आशा होती. सुटका होताच त्यांनी जवळच्या एका बागेत जाऊन स्नान केले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा सहर्ष स्वीकार केला आणि आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या.
‘‘हे मुहम्मद (स.)! या अवघ्या धरतीवर तुमच्यापेक्षा जास्त अप्रिय व्यक्ती माझ्या दृष्टीत कोणीही नव्हती. मात्र आज तुम्हीच या समस्त जगामध्ये मला सर्वाधिक प्रिय आहात. ईश्वराची शपथ! पूर्वी तुमच्या धर्मापेक्षा वाईट धर्म माझ्या दृष्टीत कोणताही धर्म नव्हता, मात्र आज सर्वांत जास्त माझा आवडता धर्म ‘इस्लाम’ हाच आहे. ईश्वराची शपथ! समस्त जगात आज मला तुमचीच वसती प्रिय आहे!” पहिल्या दिवशी तर सुमामांना वाटले की त्यांची हत्या करण्यात येईल. मात्र त्यांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्यांची निराशा संपली आणि त्यांना मनापासून वाटले की प्रेषितांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. म्हणूनच त्यांनी प्रेषितांशी बोलताना शालीन आणि सभ्य शब्दांचा वापर केला. जणू प्रेषितांचा हा चमत्कारच होता की त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांचा विरोधक आणि वैरीसुद्धा त्यांचा मित्रच होत होता.
हुदैबियाच्या शस्त्रसंधीप्रसंगी माननीय अस्मा (रजी.) (प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या भार्या) यांची आई अद्याप मूर्तीपूजक होती. ती आपल्या मुलीकडे अर्थात अस्माकडे आली आणि आर्थिक मदत मागितली. माननीय अस्मा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई अद्याप मुस्लिम झालेली नाही आणि तिला माझ्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, मी तिला मदत करणे योग्य ठरेल काय?” यावर दयाळू आणि कृपाळू प्रेषितांनी सांगितले, ‘‘तिच्याशी दयापूर्ण व्यवहार करावा आणि शक्य होईल तेवढी मदत करावी!”
माननीय अबू हुरैरह (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कट्टर अनुयायी आणि हदीस संग्रहक होते. मात्र त्यांची आई प्रेषितांना रोज शिव्या-शापांची लाखोली वाहायची. माननीय अबू हरैरह (रजी.) यांना याचे खूप दुःख वाटायचे. त्यांनी प्रेषितांसमोर हा सगळा प्रकार ठेवला, प्रेषितांनी तिच्यावर राग न धरता तिच्यासाठी ईश्वरदरबारी प्रार्थना केली आणि त्यांची ही प्रार्थना स्वीकार झाली. तिने इस्लामचा स्वीकार केला.
सातव्या हिजरी सनात ‘फिदक‘वर विजय प्राप्त झाला. माननीय बिलाल (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विशिष्ट निकटस्थ व्यक्ती आणि परिवाराचे प्रबंधक होते. पैसे नसल्यावेळी बाजारातून उसणे-पासणे सामान घेऊन येत आणि पैसे आल्यावर उधारी देऊन टाकीत असे. एकदा एक बिगरमुस्लिम व्यक्तीने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला कर्ज हवे असल्यास माझ्याकडून घेत जा.”
माननीय बिलाल यांनी त्याच्याकडून कर्ज घेतले. एके दिवशी तो बिलाल (रजी.) यांच्याकडे आला आणि तावातावाने म्हणाला,
‘‘ए काळ्या-कुट्ट माणसा! कर्ज परतफेडीच्या मुदतीसाठी फक्त चारच दिवस बाकी आहेत. तू परतफेड नाही केलीस तर तुला माझ्या शेळ्या चारवाव्या लागतील.” या प्रकाराने दुःखी होऊन बिलाल (रजी.) थेट प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर हजर झाले. सगळा प्रकार त्यांच्या समोर ठेवला. मात्र प्रेषितांनी त्या सावकाराच्या या दुष्टतापूर्ण व्यवहाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे कर्ज देऊन टाकले.
नजरान शहरावरून ख्रिस्ती धर्मियांचे एक प्रतिनिधीमंडळ मदीना शहरी प्रेषित मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले. प्रेषितांनी त्यांचा सत्कार केला आणि मस्जिदामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या धार्मिक रिती-रिवाजानुसार उपासनेची पूर्ण परवानगीसुद्धा दिली.
सत्यधर्माचा प्रचार करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताईफ येथे दौरा केला. हा दौरा एक ऐतिहासिक घटना आहे. ताईफ येथील दौर्यावर असताना तेथील लोकांनी त्यांच्याबरोबर क्रूर आणि दुष्टतापूर्ण व्यवहार केला आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून त्यांना रक्तबंबाळ केले, मात्र प्रेषितांनी त्यांना शाप न देता त्यांच्या हितातच ईश्वरदरबारी प्रार्थना केली.
प्रेषित शिरोमणी मुहम्मद (स.) यांचे अवघे व्यक्तीमत्त्व म्हणजे ईश्वरी देणगी असलेले दया आणि कृपेचे एक मूर्त स्वरूपच होते. त्यांच्या अवघ्या जीवनात त्यांच्याकडून कोणासही काय अगदी त्यांच्या प्राणांवर बेतलेल्या शत्रुंनासुद्धा दया आणि कृपा मिळाली. आणि हेच कारण आहे की प्रेषितांच्या याच दयाळू व कृपाळू स्वभावामुळे या जगात इस्लामचा प्रचार व प्रसार झाला.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *