Home A स्त्री आणि इस्लाम A इस्लाम व महिलावर्ग

इस्लाम व महिलावर्ग

इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो. अशा समाजाची इस्लामशी जोड कशी लावली जाऊ शकते, जेथे मुलींना ‘कॉल गर्ल’ केले जाते, तिला नागडी करून नाचायला लावले जाते आणि पुरुषांच्या कामवासनेची पूर्तता करणारी भोग्य वस्तू, असे तिला मानले जाते. पाश्चिमात्यांच्या नैतिक मापदंडात इस्लामी महिला कशा बसू शकतात बरे? इस्लामने महिलांना जे हक्क व अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार कोठे कोठे त्यांना मिळत नाहीत, ही गोष्ट काही अंशी खरी आहे. त्यामुळे महिलांना त्रासही होत असतो. हेही एक मर्यादेपर्यंत ठीक आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपले इस्लामी अधिकार कोणते आहेत व आपली कर्तव्ये कोणती आहेत, हे पूर्णपणे जाणत नाही अथवा ते पूर्णपणे आचरणात आणत नाहीत.
इस्लामने पुरुषांना व महिलांना समान हक्क दिलेले आहेत. आपला समाज आज सुद्धा कन्यांना डोक्यावर असणारे ओझे समजतो. इस्लाम पुत्र व कन्या यांच्यात कसलीही फरक करीत नाही. मानवाच्या तत्त्वाने दोहोंना समान मानतो. शारीरिक व मनोवैज्ञानिक दर्जाने त्या दोहोंमध्ये मोठाच फरक असतो. तो प्राकृतिक फरक दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या हक्कांची व अधिकारांची तसेच त्यांच्या कर्तव्यांची यादी तयार करतो. हा फरक लक्षात घेऊन, महिलांना जे विशेष स्थान व दर्जा मिळणे आवश्यक आहे, ते सर्व महिलांना इस्लाम देतो, त्यांचे संरक्षणही करतो. महिलांना तो पुरुषांच्या दया-कृपेवर सोडून देत नाही. इस्लामची अशी इच्छा आहे की महिलांवर त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक भार टाकला जाऊ नये. पुरुषांना महिला बनणे आणि महिलांनी पुरुष होणे ही गोष्ट प्रकृतीविरूद्ध आहे आणि इस्लामला ती स्वीकारार्ह नाही.
‘‘पत्नीशी चांगली वागणूक करण्याबाबतची माझी ताकीद स्वीकार करा.’’- बुखारी, मुस्लिम
कुरआनचे फर्मान आहे,
आणि त्यांच्याशी चांगली वागणूक करा – सूरह : निसा-१९
पत्नींचे अधिकार व हक्क जसे त्यांच्या पतीवर तितकेच उघड व स्पष्ट आहेत, तसेच पतीला पत्नीवरही अधिकार आहेत. पतींना एक दर्जा अधिक प्राप्त आहे.- सूरहः बकरा – २२८
विवाह व तलाक
महिलासंबंधी आणखी एक महत्त्वाचा विषय विवाह आणि तलाकचा आहे. विवाहाला ‘निकाह’ म्हटले जाते. एक पुरुष व एक महिला आपल्या स्वतंत्र मर्जीनुसार एकमेकाजवळ पति व पत्नीच्या स्वरूपात निर्णय घेतात. त्यासाठी तीन अटी आहेत. एक अशी की पुरुषाने वैवाहिक जीवनाच्या जबाबदार्या स्वीकारण्याची शपथ घ्यावी. आपसात विचार-विनिमयाने मान्य झालेली एक निर्धारित रक्कम, मेहेरच्या स्वरूपात पतीने पत्नीला द्यावी आणि या नव्या शरीरसंबंधाची उघडपणे घोषणा केली जावी. असे केल्याविना कोणाही स्त्री-पुरुषाने एकत्रित राहाणे आणि लैंगिक संबंध ठेवणे; अगदी चूक आहे, इतकेच नाही तर तो एक मोठा अपराध आहे.
हा वैवाहिक संबंध दोघंपैकी एकाच्या इच्छेनुसार संपुष्टातही आणला जाऊ शकतो आणि तो अधिकार इस्लाम देतो. याचेच नाव ‘तलाक’ अथवा घटस्फोट आहे. महिलेसाठी आणि पुरुषासाठी तलाकचा एक नियम व एक पद्धत अशी आहे की त्यांच्यापैकी कोणीही वैवाहिक जीवनापासून असंतुष्ट असेल आणि त्यांचे एकत्रित राहाण्याची जर शक्यताच राहिली नसेल, तर दाखवून दिलेल्या पद्धतीने, टप्प्याटप्प्याने त्यांनी वेगळे व्हावे आणि त्यांना वाटल्यास त्यांनी दुसरा विवाह करून घ्यावा. तलाक ही काही चेष्टा किवा मस्करी नाही. त्याकडे जर एखाद्याने गंभीरपणे पाहिले नाही, तर तो दोष त्या व्यक्तीचा असेल, नियमाचा दोष नाही.
अगदी अपरिहार्य व अनिवार्य स्थितीमध्येच तलाकची परवानगी दिलेली आहे. त्याच्या दुष्परिणामांकडे पाहाता पुरुषाला तलाकपासून रोखण्यात आलेले आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद(स.) यांचे फर्मान आहे,
‘कोणीही ‘मोमीन’ पतीने आपल्या पत्नीचा तिरस्कार करू नये. तिचा एखादा गुण किवा सवय त्याला पसंत नसेल, तर तिचा दुसरा एखादा गुण अथवा सवय त्याला आवडू शकते.’’- मुस्लिम
पती-पत्नींनी तलाक देण्याचा निश्चयच केला असेल तर इस्लामने अशी पद्धत ठरवून दिली आहे की तलाकचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नवर्याकडील एक-दोन माणसे व पत्नीकडील एकदोन माणसे एकत्र बसून बोलणी करावी आणि असा एखादा मार्ग शोधून काढावा, ज्यामुळे दोघातील मिलाफ वाढेल, त्यांची मने पुनः जुळतील आणि तलाक देण्याची वेळच येणार नाही. इतकेच करून जर समझोता होऊच शकला नाही आणि तलाकशिवाय दुसरा पर्यायच नसेल त्यावेळी पतीने एकच वेळ तलाक द्यावा व म्हणावे ‘मी तुला तलाक दिला आहे,’ दोन न्यायनिष्ठ साक्षीदारासमक्ष तलाक द्यायला हवा. ‘तुहर’(मासिक पाळी संपल्यानंतरच्या काळातील स्थितीत) च्या अवस्थेत तलाक दिला जावा, ज्यात पतीने पत्नीशी शैय्यासोबत केलेली नसावी. तलाकनंतर त्या स्त्रीला ‘इद्दत’ चा काळ म्हणजे एक ठराविक कालावधी काढावा लागेल. त्या मुदतीत पुरुष पुनः तिचा अंगिकार करू शकतो. तीचा स्वीकार करण्यास पुरुष जर राजी नसेल, तर स्त्री पूर्णपणे विभक्त होईल. त्यांची इच्छा असल्यास ते पुनः निकाह करू शकतात.
इस्लाममध्ये तलाकची हीच अचूक पद्धत आहे. त्याचा विचार करायला पुरुषाला पुरेसा अवधी मिळतो. स्त्रीच जर पुरुषापासूनच विभक्त होऊ इच्छित असेल, तर तिला पुरुषाकडून ‘खुलअ’(पत्नीने मागितलेला घटस्फोट) करून घेऊ शकते.

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *