एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
एकेश्वरत्वात आणि प्रेषित्वात अंतःकरणपूर्वक श्रध्दा असणे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्या श्रध्देला मान्य करणे आणि मानल्यानंतर तोंडी अभिवचन देणे होय, प्रेषितवचनांचा आणि धार्मिक विद्वानांच्या टिकात्मक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळून येते की मुस्लिम (श्रध्दावंत) बनण्यासाठी फक्त मनापासून श्रध्दा असणे हे पुरेसे नाही तर त्यासाठी तोंडी अभिवचन अथवा घोषणा करणे हेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. तोंडी घोषित केल्याशिवाय श्रध्दा वैध ठरत नाही. तोंडी अभिवचन देणे आणि घोषणा करणे म्हणजे सत्य मान्य करणे की इस्लाम हा धर्म- परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे आणि कुजबुजणारी मुहीम मुळीच नाही. इस्लामच्या कर्तव्यांची पूर्तता एकांतात होऊच शकत नाही. हा तो धर्म आहे जो समस्त मानवतेशी उंच आवाजात संभाषण करीत आहे. (कुजबुज नव्हे) जीवनाच्या प्रचंड अशा गोगांटामध्ये इस्लाम मनुष्याला प्रस्थापित करीत आहे. इस्लाम मनुष्याला चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या निरंतर चाललेल्या संघर्षात गुंतवून ठेवतो. इस्लाम मुस्लिमाला अविश्वास आणि अनाचाराच्या निरंतर लढाईतील सैनिकांमध्ये सर्वांत पुढे ठेवतो. अशा परिस्थितीत इस्लामचा स्वीकार करण्याची आम घोषणा करणे अत्यावश्यक ठरते. ती त्याच्या श्रध्दाशीलतेने (ईमानने) त्यावर सोपविलेल्या धर्मप्रचारकाची आणि कर्तव्यपूर्तीसाठी लढणारा सैनिकाच्या जबाबदारीची घोषणा आहे. म्हणून इस्लामच्या श्रध्दाशीलतेबद्दल आम घोषणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मौलिक कार्य आहे.
या मान्यतेचा आणि उद्घोषणेचा आपण जर राजकीय दृष्टिकोणातून विचार केला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. जो कोणी व्यक्ती अल्लाहच्या एकेश्वरत्वाला आणि मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वाला जाहिररित्या मान्य करून विश्वास ठेवतो, त्याला श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणतात. जरी तो खरोखरच विश्वास श्रध्दा ठेवत नसेल किवा व्यवहारात इस्लामच्या कर्तव्यपूर्तीस अपयशी ठरत असेल. श्रध्दाशीलतेची (ईमानची) जाहिररित्या कबूली देऊन त्या व्यक्तीस इतर मुस्लिमांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक फायदे मिळतात. जर दुसरा एखादा व्यक्ती मनापासून इस्लामवर श्रध्दा ठेवून आहे परंतु त्याने त्यास जाहिररित्या कबूली दिली नाही तर त्याला मुस्लिम म्हणून स्वीकारले जाणार नाही. तो तर मुस्लिमेतरच राहील आणि त्याच्याशी तसाच व्यवहार केला जाईल. मनुष्याने जर इस्लामच्या श्रध्देतील अचूकपणा आणि सत्यतेवर निष्ठा ठेवली तर अशी व्यक्ती इस्लामचा मजबूत पाया प्राप्त करून घेते आणि उत्साहाने इस्लामवर श्रध्दा ठेवून जाहिररित्या त्याला मान्य करते. अशा प्रकारे मनुष्य इस्लामच्या प्रथमस्तंभास परिपूर्ण करतो म्हणजेच इस्लामच्या प्रथमस्तंभाची उभारणी करतो.
0 Comments