Home A आधारस्तंभ A इस्लामचा दुसरा स्तंभ नमाज

इस्लामचा दुसरा स्तंभ नमाज

नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत. त्यातील काही स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहेत.
नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण आहे. नमाज प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या परंपरेनुसारच अदा करतात. श्रध्दाशीलता धारण केल्यानंतर सर्वप्रथम श्रध्दावंत नमाज अदा करतो. नमाज त्या सत्यतेचे द्योतक आहे की व्यक्ती श्रध्दाशील आहे, अल्लाहवरच त्याची निष्ठा आहे. अल्लाह एकमेव स्वामीश्रेष्ठ आहे आणि मी त्याचा नम्र दास आहे. हा विश्वास त्याच्या नमाजच्या कर्तव्यपूर्तीतून दिसून येतो. नमाजबद्दल अनेक हदीसींचा उल्लेख आलेला आहे.
याचप्रमाणे दिव्य कुरआनमध्ये अनेक ठिकाणी श्रध्दाशीलतेच्या उल्लेखानंतर त्वरित नमाजचा उल्लेख आलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
तसेच दुसऱ्या ठिकाणी कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक ग्रंथाचे पालन करतात व ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही.’’ (कुरआन ७: १७०)
‘‘परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली’’ (कुरआन ७५: ३१)
हे त्या सत्यतेला स्पष्ट करीत आहे जर मनुष्याच्या हृदयात श्रध्देचे बीजारोपण झाले तर त्यातून पहिले अंकूर फुटेल ते नमाज असेल. नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण फक्त नाही तर ते तर्कशुध्द परिणाम आहे. ज्याचे हृदय श्रध्देने काठोकाठ तुडुंब भरलेले असेल त्याचे मस्तक आज्ञाधारकतेत नमाजमध्ये नतमस्तक होणारच आहे. हे खरोखर तर ती आंतरिक स्थिती आहे ज्याचे प्रकटीकरण नमाजच्या रूपात होत असते. जसे प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून आहे तसेच श्रध्देतून नमाज आहे आणि नमाज श्रध्देसाठी आहे. म्हणून नमाज श्रध्देची अत्यावश्यक बाब आहे हे काही फक्त अनुमान नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अतिस्पष्ट कथन आहे, ‘‘जो कोणी फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) साठी हलगर्जीपणा करतो, अशा व्यक्तीशी अल्लाहला काही देणेघेणे नाही.’’ (अहमद)
‘‘खरोखरच! नमाज मनुष्याला श्रध्दाहीनतेपासून आणि द्रोहापासून वेगळे करते.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी नमूद करून ठेवले आहे की ज्या वस्तीतून आजान ऐकू येत असे त्या वस्तीवर जिहाद (पवित्र युध्द) केला जात नसे. जेथून अजानचा स्वर ऐकू येत नसे त्या वस्तीवर चढाई केली जात असे. कारण ती वस्ती श्रध्दाहीन लोकांची आहे हे समजून येत असे. म्हणून नमाज श्रध्दाशीलतेचे प्रतीक आहे. श्रध्दावंत व्यक्ती या प्रतीकाशी नमाजशी निगडीत असते.
कुरआनोक्ती आहे की कयामतच्या दिवशी दूत नरकवासींना विचारतील,
‘‘ते (दूत) गुन्हेगारांना विचारतील,‘‘तुम्हाला कोणत्या गोष्टीने नरकात नेले?’’ ते म्हणतील, ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो आणि गरिबांना जेऊ घालत नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४२ – ४३)
नरकवासी लोक उत्तर देतील,
‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४३)
याचाच अर्थ स्पष्ट होतो की जो कोणी नमाज अदा करतो तो श्रध्दावंत असतो आणि त्याची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर निष्ठा असते. हे अगदी स्पष्ट आहे की व्यक्तीची जन्नत (स्वर्ग) अथवा जहन्नम (नरक) साठीची लायकी आणि पात्रता श्रध्दाशीलता आणि श्रध्दाहीनतेवर अवलंबून आहे. जेव्हा मनुष्यांना जहन्नममध्ये (नरकात) डांबले जाईल तेव्हा ते सर्व गुपितांना जाणून घेतील जे अदृश्य सत्य होते. ते मान्य करतील की ही यातना परिणाम आहे त्यांच्या नमाज अदा करण्याच्या हलगर्जीपणाचा! ईमान (श्रध्दा) आणि नमाज कयामतच्या दिवशी एक दुसऱ्यास पूरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे असतील. ‘‘जहन्नमी (नरकवासी) त्या वेळी असे म्हणण्याऐवजी की ‘‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो ज्यांनी श्रध्दा ठेवली.’’ (‘‘आम्ही श्रध्दावंतांपैकी नव्हतो.’’) असा पश्चात्ताप करून करून म्हणतील की ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यापैकी नव्हतो.’’
या संकेतवचनांच्या आधारे काही धार्मिक विद्वानांचे मत आहे की जो कोणी हेतुपुरस्सर नमाजची हेळसांड करेल आणि नियमित हे कृत्य करीत राहील तर तो शिरच्छेद करण्याच्या लायक बनतो. ही शिक्षा धर्मद्रोही (विद्रोही) ला दिलेल्या शिक्षेसारखीच आहे.
आणखी एक अतिमहत्वाचे नमाजचे वैशिष्ट्य कुरआन स्पष्ट करीत आहे त्याची पुष्टी हदीसीमध्ये (प्रेषितकथन) सुध्दा आहे, ती म्हणजे नमाजला धार्मिक कृती म्हणून संबोधले गेले आहे. नमाज श्रध्दाशीलतेची (ईमान) रक्षक आहे. नमाज जर कायम केली गेली तर इतर ईश आदेशांचे पालन आपोआप होऊ लागते. याविरुध्द नमाजची हेळसांड झाली तर इतर ईश आदेशांचे उल्लंघन होणे साहजिक आहे. हृदयाचे महत्त्व शरीरात जसे आहे त्यासारखेच नमाजचे महत्त्व श्रध्दाशीलतेसाठी आहे. हृदय जर तंदुरूस्त असेल तर रक्त शरीराच्या सर्व भागांत पसरते आणि पूर्ण शरीर हे कार्यक्षम व तंदुरूस्त बनते. जर हृदयाची स्पदने बंद झाली आणि हृदयक्रिया बंद पडली तर पूर्ण शरीर निर्जीव बनते, अकार्यक्षम बनते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे कुरआन आणि हदीसीमध्ये स्पष्ट केली गेली आहेत. हदीसीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे इस्लामचा पाया हा पाच स्तंभांवर आधारित आहे आणि तसेच ईमानचा (श्रध्देचा) स्तंभ नमाज आहे, प्रार्थना आहे.
‘‘श्रध्देचे मूळ हे एकेश्वरत्व आणि प्रेषित मुहम्मद (स) यांना मान्य करण्यात आहे आणि श्रध्देचे मूळ (स्तंभ) इस्लाम आहे.’’ (तिरमीजी)
हा एक सज्जड पुरावा आहे या वास्तवतेचा की जकात, हज, रोजे हे श्रध्दाशीलतेचे (ईमानचे) स्तंभ आहेत आणि श्रध्देची इमारत त्यांच्याशिवाय उभीच राहू शकत नसली तरी नमाजचे महत्त्व वेगळेच आहे. नमाजच्या गुणांमुळे नमाज श्रध्देचा सर्वगुणसंपन्न स्तंभ आहे, म्हणूनच नमाजला पूर्ण श्रध्देचे वैशिष्ट्य गणले जाते. जर नमाजला सोडून दिले तर श्रध्दा आपले अस्तित्व गमावून बसते.
आदरणीय खलीफा उमर (र) आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘‘माझ्यासाठी तुमची सर्वात मोठी समस्या नमाज ही आहे. जो कोणी नमाज कायम करील आणि तिला पूर्ण न्याय देईल तर तो पूर्ण श्रध्देचे रक्षण करतो. आणि जो कोणी नमाजला सोडून देतो तर ती व्यक्ती फार काही गमावून बसते.’’ (मालिक)
नमाजच्या वैशिष्ट्यांची कारणे: दिव्य कुरआन आणि हदीसीच्या पुराव्यानुसार नमाजचे महत्त्व लक्षात येते. स्वाभाविकपणे एखादी व्यक्ती विचारू शकते की हे असे कसे की पाच स्तंभांपैकी नमाज एक स्तंभ आहे तर मग नमाज एकटी पूर्ण श्रध्देसारखी कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर हे आणखी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. नमाज काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? दिव्य कुरआन स्पष्ट करीत आहे की नमाज अल्लाहचे स्मरण आहे.
‘‘मीच अल्लाह आहे माझ्या शिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच भक्ती कर आणि माझ्या स्मरणाकरिता नमाज कायम कर.’’ (कुरआन २०: १२-१४)
नमाज ईशदासाला ईश्वराच्या सान्निध्यात नेते.
‘‘आणि नतमस्तक व्हा (नमाज अदा करा) व आपल्या पालनकर्त्याशी जवळीक साधा.’’ (कुरआन ९६: १९)
मनुष्य अल्लाहच्या अगदी जवळ असतो जेव्हा तो नतमस्तक होतो. (सजदा करतो) म्हणून मनुष्य नमाज अदा करीत असेल तर तो त्या वेळी अल्लाहशी संभाषण साधून असतो. नमाज अदा करताना मनुष्य सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊन स्वतःला अल्लाहच्या सान्निध्यात आणि अल्लाहसमोर उभा आहे असे समजून अल्लाहशी वार्तालाप करतो.
अल्लाहचे स्मरण करणे, अल्लाहशी जवळीक साधणे आणि अल्लाहशी संभाषण करणे म्हणजेच नमाज अदा करणे होय. याव्यतिरिक्त दुसरे आणखी काय माध्यम असू शकते अल्लाहची शरणागती आणि पूर्ण श्रध्देला प्राप्त करण्यासाठी? नाही! निश्चित नाही!! अल्लाहची भक्ती करण्यासाठीचे प्रत्येक कृत्य श्रध्देचेच फळ आहे. अल्लाहच्या स्मरणाने (नमाज) श्रध्देचे मूळ सशक्त बनते त्यास जोपासले जाते. श्रध्दावंतांना उपदेश केला जातो की त्यांनी खालील महावाक्य सतत उच्चारून श्रध्देला सशक्त बनावे.
‘‘ला ईलाह ईल्ललाह’’
दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह!
अल्लाहशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही.
‘‘लोकहो, तुमची श्रध्दा बळकट करा’’ दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह’’ हे महावाक्य पुन्हापुन्हा उच्चारून!’’ (बुखारी)
जर झाडाच्या मुळांनी त्यांची जीवनशक्ती आणि अन्नपाणी घेण्याचे बंद केले तर झाडाची वाढ खुंटेल आणि झाड वाळून जाईल. तसेच मनुष्याचे हृदय हे जर अल्लाहच्या स्मरणाने खाली असेल तर श्रध्दा जीवंत ठेवणे त्याच्यासाठी अशक्य आहे. ज्या मनुष्याची श्रध्दा डळमळीत आहे, त्याचे प्रत्येक कृत्य हे सत्यतेविरुध्द आणि अल्लाहच्या भयाने रिक्त असे असेल. धर्मनिष्ठ कृत्य (सत्कार्य) त्याच व्यक्तीच्या हाताने पार पडेल ज्याचे हृदय श्रध्देने आणि सामर्थ्याने पुरेपूर भरलेले असेल, ज्यांचा उगम अल्लाहच्या स्मरणात आहे. नमाज अल्लाहचे फक्त स्मरण नाही तर नमाज खरोखरच अल्लाहच्या स्मरणाचे अत्युत्तम, परिपूर्ण आणि कार्यक्षम असे बेजोड माध्यम आहे. म्हणून धर्मनिष्ठा आणि अल्लाहची भक्ती नमाज अदा करण्यात आहे. हे सत्य आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू या, एखादा भाट (खुशामत्या) जो आपल्या राजासमोर येत नाही आणि त्याच्याविषयी आदर सन्मानसुध्दा दाखवत नाही तर त्याला विश्वासु आणि आज्ञाधारक समजले जात नाही. विश्वासु आणि आज्ञाधारकता त्याच व्यक्तीपासून अपेक्षित आहे जो राजदरबारात राजासमोर हजेरी लावण्यात हलगर्जीपणा करत नाही आणि राजाला आदर सन्मान दाखविण्यात कसूर करत नाही. हे स्वाभाविक आहे की जी व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही ती तुमच्या इच्छेला आणि प्रसन्नतेला जाणून घेण्यास तयार होऊ शकतच नाही. तुमच्यासाठी अशी व्यक्ती काहीएक त्याग करू शकणार नाही. नमाज हे अल्लाहच्या दरबारात हजेरी लावणे आहे. आणि अल्लाहच्या प्रति निष्ठेचे आणि आदराचे प्रकटीकरण आहे. कोणी अंतकरणाने ही हजेरी देण्यास आणि निष्ठा दाखविण्यास तयार नसेल तर अशी व्यक्ती अल्लाहचे आदेश जीवनव्यवहाराच्या या विस्तृत क्षेत्रात पाळू शकणारच नाही हे अगदी स्पष्ट आहे.
नमाजची पूरक वैशिष्ट्ये: नमाजचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, परंतु नमाजचे आणखी काही उपजत अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु ही सर्व पूरक अशी वैशिष्ट्ये आहेत तरी ती अत्यंत महत्त्वाची आणि मौलिक आहेत. त्यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे कारण त्यावरून इस्लामचे दर्शन आणि जीवनप्रणाली कळून येते. हे पूरक आकर्षक गुण आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम आपल्या अनुयायींना त्यांचे जीवनकार्य त्यांच्या मनावर बिबवतो. यासाठी ते स्वाभाविकपणे एक शिस्तबध्द सामुदायिक जीवनाचे नेतृत्व करतात. त्यांचा एक नेता असतो जो अल्लाहच्या आदेशांनुसार स्वतः जीवन कंठत असतो आणि समाजापुढे आदर्श ठेवतो. तो ईशआदेशांना प्रस्थापित करतो. त्याच्या नेतृत्वाखाली लोक एक शिस्तबध्द आणि प्रशिक्षित लष्करासारखे वागतात. तो जेव्हा त्यांना हालचाल करण्याची मुभा देतो तेव्हा ते हालचाल करू शकतात आणि जेव्हा तो त्यांना थांबवतो तेव्हा ते थांबतात. अशी ही उच्च प्रतीची शिस्त नमाजमध्ये अंतर्भूत आहे आणि नमाज इस्लामच्या अनुयायींच्या मनावर शिस्तबध्दता ठसवत असते. जेव्हा त्यांना नमाजसाठी बोलविले जाते तेव्हा ते आपले घरदार, कारखानदारी, दुकानदारी सोडून मशिदीची वाट चालू लागतात. मशिदीत ते सरळ रेषेत व रांगेत उभे राहतात आणि नमाजचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे (इमाम) आदेश पूर्णतः पाळतात. एखादा व्यक्ती या सामुदायिक प्रार्थनेत आपल्या नेत्याविरूध्द शारीरिक आणि मानसिक दुर्लक्ष करूच शकत नाही. हे सर्व काही दैवी आदेशांच्या आज्ञाधारकतेनुसार धार्मिक आज्ञा आणि परलोकाची जाण ठेवून पार पाडले जाते. नमाजव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणती प्रार्थना आहे जी मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण शिस्तबध्दतेने देत आहे?
२) इस्लामला आपल्या अनुयायींमध्ये प्रेमाचे आणि बंधुत्वाचे अतूट नाते स्थापित करणे अपेक्षित आहे. इस्लाम त्याच मुस्लिम व्यक्तीला खरा मुस्लिम सिध्द करतो जो आपल्या भावासाठी तेच पसंद करतो जे स्वतःला पसंद आहे. नमाज माणसामध्ये प्रेम आणि बंधुत्व निर्माण करते. जेव्हा वस्तीतील लोक प्रार्थनेसाठी अल्लाहसमोर एकत्र येतात तेव्हा ते शारीरिक आणि अध्यात्मिक बंधुभाव प्रस्थापित करतात. त्यांचे एकमेकाचे खांदे आणि अंगठे फक्त एकमेकांना भिडलेले असत नाहीत तर त्यांची मनेसुध्दा एकीने बांधली जातात. ते फक्त आपल्या स्वतःसाठीच प्रार्थना करीत नाहीत तर सर्वांसाठी मार्गदर्शन मदतीची आणि क्षमेची याचना करतात. काय यापेक्षा चांगले दुसरे एखादे मार्ग मानवतेवर प्रेम करण्याचे याव्यतिरिक्त आहे? मनुष्य आपल्या बांधवांचा प्रार्थनेत आणि नमाजमध्ये कधीच विसर पडू देत नाही. तो अल्लाहसमोर सातत्याने याचना करतो की,
‘‘आम्हा सर्वांना सरळ मार्ग दाखव.’’ (कुरआन १: ५)
‘‘अल्लाहच्या सर्व सदाचरणी दासांवर शांतीचा वर्षाव सतत होवो.’’
‘‘हे आमच्या पालनकर्त्या ! आम्हाला इहलोकीही चांगले फळ दे आणि परलोका मध्येही चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हा सर्वांना वाचव.’’ (कुरआन २: २०१)
अति उच्च समजली जाणारी विश्वबंधुत्वाची कल्पना इस्लामच्या या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेपुढे फिकी आहे. जो दर्जा इस्लामने आपल्या अनुयायींसाठी निश्चित केला आहे तो बेजोड आहे.
३) इस्लाम समस्त मानवांना एक स्वामीचे दास समजतो. इस्लाम समस्त मानवजातीला एका आईवडीलाची लेकरे मानतो. मानव सर्व एकमेकांचे भाऊ भाऊ आहेत.
‘‘हे अल्लाहच्या दासानों तुम्ही सर्व बंधु व्हा.’’ (कुरवादी)
इस्लाम आज्ञा देतो की कोणीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नये. कुणीही रंगाने, वंशाने, कुळाने, श्रीमंतीने अथवा राष्ट्राने एकमेकात उचनीच नाहीत. ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,
‘‘मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायणता या सदगुणांवर अवलंबून आहेत.’’
नमाज समाजातील, माणसामाणसातील भेदाभेद दूर करून एकसंघ समाजनिर्मितीचा पाया घालते. राजा आणि रक एकसाथ उभे राहून एकसाथ आपल्या स्वामीपुढे नतमस्तक होतात. हे नमाजच्या प्रक्रियेतील एकतेचे प्रकटीकरण आहे. आध्यत्मिक स्तरावरसुध्दा नमाज सर्वांना एकसमान बनविते. अल्लाहचे महात्म्य आणि मनुष्यांचे पूर्ण नम्रता धारण करणे हे सर्व मनुष्यांच्या मनांमध्ये एकीची भावना जागृत करते. प्रत्येकजण जाणून घेतो की अल्लाह आणि फक्त अल्लाह प्रभुत्वशाली आहे. सर्व माणसे त्याची निर्मिती व दास आहेत. नमाजमुळे प्रत्येकाला त्याच्या तुच्छतेची जाणीव सतत होत राहते. म्हणून असा मनुष्य रंगभेद, जातीभेद, वंशभेद, राष्ट्रभेद, उच्चनीचता या कुकर्मांना कधीच थारा देत नाही. स्वतःलासुध्दा इतरांपेक्षा काही वेगळा अथवा श्रेष्ठ समजत नाही. अशा प्रकारे नमाज या सत्यवचनाला सिध्द करून दाखविते की ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायण या सद्गुणांवर अवलंबून आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *